मुख्य सामग्रीवर वगळा

कोरोना.. कठीण...पण शांततेचा काळ......

                                     




                                   
                                             कोरोना.. कठीण...पण शांततेचा काळ......
     गेले तीन महिने आपण सर्वजण कठीण काळात जगत आहोत. पण हा काळ कठीण असला तरी अनेकांसाठी तो शांततेचा आहे. या तीन महिन्यांत देशातील अनेक गोष्टी बंद होत्या. त्याचा परिणाम आपल्याला पुढील काही वर्षामध्ये दिसणार आहे. पण आपण या तीन महिन्यातील शांततेच्या काळात काय केले याचेही अवलोकन करणे महत्त्वाचे आहे. शांततेच्या काळात आपण जे कार्य केलेले आहे ते नजीकच्या काळात आपल्याला उपयोगी पडणार आहे. 
      मालवण येथील संग्राहक उदय रोगे यांनी कोरोना साथ रोगाच्या कालावधीत माफक किमतीतील मास्कची निर्मिती केली. त्याच्या या उपक्रमाला अनेक स्वयंसेवी संस्थांचा प्रतिसाद मिळाला. पत्रकार मित्र सिद्धेश आचरेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी नारळाच्या करवंट्या तसेच बांबू पासून अनेक सुंदर वस्तू बनवल्या. सिद्धेशने सोशल मिडीयाच्या माध्यमातून या वस्तू अनेकांपर्यंत पोहचवल्या. काही जणांनी ह्या वस्तू रोजगाराचे साधन असल्याचे सांगितले. भरतगड इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे खोत यांनी घरच्या घरी अनेक शैक्षणिक वस्तू बनवल्या आहेत. या शैक्षणिक वस्तूंचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. 
    मालवण तालुका सानेगुरुजी कथामालेतर्फे व्हाँट्स अप ग्रुपद्वारे कथा सांगू आनंदे हा उपक्रम राबविण्यात आला. टोपीवाला काँलेजर्फे विद्यार्थ्यांसाठी आँनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरु करण्यात आले आहेत. दांडी येथील महिला व विद्यार्थ्यींनी सोशल डिस्टसिंग पाळत कोरोना लढ्यासाठी आर्थिक मदत गोळा केली. चैतन्य गुड माँर्निंग, आस्था ग्रुप या सारख्या संस्थांनी गरीब व गरजूंना जेवणाची सोय केली. आस्था ग्रुपने अपना बाजार भरवून नागरिकांना माफक किमतीत भाज्या  उपलब्ध करुन दिल्या. एकता मित्र मंडळ, धक्का मित्रमंडळ यांनी रक्तदान शिबिर आयोजित करुन सामाजिक बांधिलकी जोपासली. बच्चे कंपनी, स्थानिक कलाकार यांनी वर्क फ्राँम अंतर्गत अनेक शाँर्ट फिल्म बनवून कोरोनाबाबत जनजार्गृतीचे महत्वाचे कार्य केले आहे. कोरोनाच्या कठीण काळात या सर्वांनी राबविलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. पुढील अनेक वर्षे या सर्वांचे कार्य नेहमी स्मरणात राहिल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.