मालवण वार्ताहर - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या स्वायत्त संस्था अंतर्गत कार्यरत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत क्षेत्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या समतादूत प्रकल्प या प्रकल्पात समतादूत म्हणून कार्य करणाऱ्या वैभववाडी येथील राजू उदय दिनदयाळ यांची कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्कृष्ट समतादूत म्हणून बार्टीच्या वतीने निवड करण्यात आली आहे. राजु दिनदयाळ यांनी गाव पातळीवर जाऊन बार्टी तसेच समाज कल्याण विभागाच्या योजनांचा प्रचार केला आहे. तसेच तालुक्यातील लाभार्थींना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला आहे. बार्टीच्या रायगड महाड येथील जिल्हास्तरीय कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.पुरस्कार निवडीबद्दल बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, विभाग व्यवस्थापक सुमेध थोरात, समाज कल्याण सिंधुदुर्गचे सहायक आयुकत संतोष चिकणे, प्रकल्प अधिकारी विजय कदम यांचे राजू दिनदयाळ यांनी आभार व्यक्त केले आहेत.