भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संघर्ष.......... आज जिल्ह्यातील वृतपत्रातून भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची व्यथा मांडणारी बातमी प्रसिद्ध झाली. राज्यातील भूविकास बँकेचे सद्यस्थितीतील 1160 कर्मचारी हालाखीचे जीवन जगत आहेत. भूविकास बँकेचे अनेक प्रश्न मी जवळून अनुभवले आहेत. कारण माझ्या वडिलांनी भूविकास बँकेत कर्मचारी म्हणून सेवा बजावली आहे. 1997-98 भूविकास बँकाना करण्यात येणारा कर्जपुरवठा बंद करण्यात आला. यानंतर भूविकास बँकेची आर्थिक स्थिती बिघडत गेली. 1999 -2000 पासून कर्मचाऱ्यांच्या पगाराचे गणित बिघडले. त्यामुळे त्याचा परिणाम भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर होऊ लागला. मुलांची शिक्षणे, लग्न, आजारपणासाठी औषधोपचार यासाठी भूविकास बँकेचे अनेक कर्मचारी कर्जबाजारी झाले. अनेकांना दागिने गहाण ठेवावे लागले. एकिकडे पगार होत नव्हते तर दुसरीकडे घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नव्हती. परंतु याही कठीण परिस्थिती भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. प्रसंगी कर्ज काढून मुलांना शिकवले. 2015 साली भूविकास बँक बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या कठीण कालावधी...