मुख्य सामग्रीवर वगळा

परिवर्तनवादी चळवळीतील सहकारी........


परिवर्तनवादी चळवळीतील सहकारी........ 
बार्टीच्या समतादूत प्रकल्पामुळे मी परिवर्तनवादी चळवळीशी जोडला गेलो. समतादूत प्रकल्पात काम करत असताना सिंधुदुर्गातील विजय कदम व सगुण जाधव या दोन परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी माझी ओळख झाली. कासार्डे येथील विजय कदम हे चळवळीतील निर्भिड कार्यकर्ते आहेत. गेली अनेक वर्षे परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून ते समताप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. कोणतीही गोष्ट स्पष्टपणे मांडायचा हा त्यांचा स्वभाव आहे. तथागत गौतम बुद्ध, डाँ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यावरील साहित्याचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. चळवळीतील  तरुण कार्यकत्यांना ते सातत्याने मार्गदर्शन करत असतात. चळवळीतील दुसरे सहकारी सावंतवाडी येथील सगुण जाधव. सगुण हा देखील अनेक वर्षे जिल्ह्यात समताप्रबोधनाचे काम करत आहे. सगुणने महाराष्ट्र व गोवा राज्यात अनेक ठिकाणी समताप्रबोधनाचे कार्यक्रम केले आहेत. संत गाडगेबाबा ही व्यक्तीरेखा साकारुन अनेक ठिकाणी समताप्रबोधन करुन सगुणने लोकांची मने जिंकली आहेत. विजय आणि सगुण यांनी आपल्या व्यक्तीगत जीवनात समताप्रबोधनाला महत्वाचे स्थान दिले आहे. समताप्रबोधन एका व्यक्तीलाही करता येते अन् हजारो व्यक्तींना हे सूत्र मी दोघांकडून शिकलो. विजय आणि सगुण दोघेही ज्या ठिकाणी वेळेची उपलब्धता असेल त्या ठिकाणी समताप्रबोधन करतात. विजय यांच्या प्रबोधनात मला कायम एक लढाऊबाणा दिसला आहे तर सगुणचे प्रबोधन शांत, सुंदर व सविस्तर विवेचन करणारे असते. दोघांच्या प्रबोधनाची पद्धत जरी वेगळी असली तरी त्याचा परिणाम चांगल्या पद्धतीने होतो.दोघांनीही समताप्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरु ठेवावे. दोघांनाही वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा! 
(संग्राम कासले, मालवण)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.