मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भंडारी हायस्कूल वार्षिक स्नेहसंमेलन

मोबाईल ही माणसासाठी दैनंदिन वापरातील एक महत्वाची वस्तु बनली आहे. मोबाईलच्या वापरामुळे आपल्याला जगभरातील ज्ञान प्राप्त होते. परंतु या मोबाईलच्या वापराची दुसरी बाजु देखील पाहणे आवश्यक आहे. मोबाईल व नेटचा वापर करुन होणा-या गुन्हयांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मुलांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन नागरी संरक्षण पथक सिंधुदुर्गचे अधिकारी संजय डौर यांनी भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन प्रसंगी बोलताना केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, साहित्यिक अजय कांडर, स्कुल क मिटीचे चेअरमन सुधीर हेरेकर, जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, खजिनदार जॉन न होना, मुख्याध्यापक हणमंत तिवले, विद्यार्थी प्रतिनिधी भाग्यश्री लाड, सर्वांगी हाथणकर, प्रकाश कुशे आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय डौर म्हणाले, सायबर क्राईम अंतर्गत सेक्सटॉर्शन व आर्थिक फसवणुकी यामध्ये नोंद होणा-या गुन्हयांची संख्या जास्त आहे. १३ ते १९ वयाची ८५ टक्के मुले पॉर्न साईट पाहतात असा एनसीआरबीचा रिपोर्ट आहे. त्यासाठी मोबाईलमधील ६० ते ७० ...

समुपदेशन म्हणजे काय?

नमस्कार आम्ही संग्राम सतीश कासले. माझे शिक्षण एम. ए.बी. एड, मास कम्युनिकेशन इन जर्नालिझम, एम. एस. डब्ल्यू झाले आहे. सध्या माझे एलएलबीचे शिक्षण सुरू आहे. मी मलेवाड पंचक्रोशी हायस्कूल येथे तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम केले आहे. मी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन करतो. हे समुपदेशन करत असताना अनेकजण प्रश्न विचारतात की समुपदेशन म्हणजे नक्की काय? त्यामुळे त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आम्ही विशेष ब्लॉग बनवला आहे. माझ्या मते समुपदेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीशी संवाद साधणे. आता हा संवाद का साधावा लागतो. तर सध्याचे मनुष्याचे जीवन हे फार वेगवान झालेले आहे. त्यामुळे मनुष्य अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. त्यापैकी ताणतणाव ही सध्याच्या काळातील माणसाची एक प्रमुख समस्या. आणि याच ताणतणावामुळे माणसाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याच समस्यांवर आपल्याला उपाय शोधायचा आहे किंवा माणसांना बोलत करायचा आहे. यासाठीच समुपदेशनाच्या आवश्यकता असते. मला या सर्वांमध्ये विद्यार्थी समुपदेशन हे अतिशय महत्त्वाचे वाटते. कारण सध्या मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा हे जग विस्तारत चालल्याम...

*अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या मालवण तालुकाध्यक्षपदी आनंद मालवणकर*

मालवण वार्ताहर - अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या मालवण तालुका शाखेची कार्यकारिणी जाहिर झाली आहे. तालुका अध्यक्षपदी आनंद नाना मालवणकर, तर सरचिटणीसपदी विलास वळंजू यांची निवड करण्यात आली. मालवण एसटी स्टँड येथील समाज मंदिर येथे झालेल्या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी अशी-कार्याध्यक्ष प्रा. कैलास राबते, उपाध्यक्ष-प्रा. नागेश कदम, राजेंद्र हरी कदम, सहचिटणीस मंगेश कदम, खजिनदार नचिकेत पवार, हिशोब तपासणीस संजय जाधव, संघटक सिद्धेश देऊलकर, प्रसिद्धीप्रमुख संग्राम कासले, सदस्य-मारुती सोनवडेकर विलास देऊलकर, श्रीकांत मालवणकर, अनिरुद्ध आचरेकर, अर्जुन पेंडुरकर, महिला प्रतिनिधी-दर्शना गुळवे, नेहा तांबे, अनुराधा आचरेकर, सल्लागार - मिलिंद जाधव, डॉ. श्रीकांत धारपवार, रंजन तांबे, रवींद्र मालवणकर.