मुख्य सामग्रीवर वगळा

भंडारी हायस्कूल वार्षिक स्नेहसंमेलन

मोबाईल ही माणसासाठी दैनंदिन वापरातील एक महत्वाची वस्तु बनली आहे. मोबाईलच्या वापरामुळे आपल्याला जगभरातील ज्ञान प्राप्त होते. परंतु या मोबाईलच्या वापराची दुसरी बाजु देखील पाहणे आवश्यक आहे. मोबाईल व नेटचा वापर करुन होणा-या गुन्हयांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मुलांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन नागरी संरक्षण पथक सिंधुदुर्गचे अधिकारी संजय डौर यांनी भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन प्रसंगी बोलताना केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, साहित्यिक अजय कांडर, स्कुल क मिटीचे चेअरमन सुधीर हेरेकर, जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, खजिनदार जॉन न होना, मुख्याध्यापक हणमंत तिवले, विद्यार्थी प्रतिनिधी भाग्यश्री लाड, सर्वांगी हाथणकर, प्रकाश कुशे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय डौर म्हणाले, सायबर क्राईम अंतर्गत सेक्सटॉर्शन व आर्थिक फसवणुकी यामध्ये नोंद होणा-या गुन्हयांची संख्या जास्त आहे. १३ ते १९ वयाची ८५ टक्के मुले पॉर्न साईट पाहतात असा एनसीआरबीचा रिपोर्ट आहे. त्यासाठी मोबाईलमधील ६० ते ७० टक्के डाटा वापरला जातो. ही बाब पालकांच्या दृष्टीने चिंता वाढवणारी आहे. कारण १८ वर्षाखालील जी मुले मोबाईल वापरत आहेत. त्यांच्याकडे असणा-या मोबाईलमधील सीम कार्ड हे पालकांच्या नावे असते. त्यामुळे मोबाईलवरुन एखादी चुकीची साईट ओपन झाली किंवा एखादी कमेंट पडली व त्यांचा संदर्भ सायबर क्राईमच्या अनुषंगाने असेल तर मोबाईनलवर घडलेली अॅक्टीव्हीटी आयपी अॅड्रेसच्या माध्यमातुन पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचते. त्यामुळे मुलांच्या मोबाईल वापराकडे पालकांचा बारकाईने लक्ष हवा.
यावेळी बोलताना अजय कांडर म्हणाले, शाळेतुन विद्यार्थ्यावर संस्कार झाले पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणा पलीकडे असणा-या गुणवत्तेचा विकास झाला पाहिजे. विद्याथ्यामध्ये कोणते गुण आहेत हे त्यांच्या शिक्षकांना निश्चितच माहिती असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील गुणांचा विकास करणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे. प्रमाण भाषा महत्वाची की बोली भाषा अशी चर्चा नेहमीच होत असते. शिक्षकांनी शिकवलेली भाषा शिकाल तर पुस्तकी ज्ञान मिळवाल व आईने शिकवलेली भाषा शिकाल तर जगाचे ज्ञान मिळवाल. या दोन्ही भाषेतुन मिळणारे ज्ञान महत्वाचे आहे. जर तुम्ही दोन्ही भाषा शिकलात तर तुम्हाला मागे वळुन पहावे लागणार नाही.
यावेळी साहित्यिक अजय कांडर, संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या आदर्श विद्यार्थी पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भंडारी हायस्कुल माजी विद्यार्थी युवा संघटनेच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा स्व. रघुनाथ टेमकर स्मृती आदर्श विद्यार्थी पुरस्कार इयत्ता नववीमधील विद्यार्थी पार्थ शैलेश मिठबावकर याला मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षापासुन अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणा-या एका गरीब व होतकरु विद्यार्थ्याची फी माजी विद्यार्थी युवा संघटनेकडुन देण्यात येणार असल्याचे संघटनेच्यावतीने जाहिर करण्यात आले. सुत्रसंचालन प फुल्ल देसाई, सुनंदा वराडकर यांनी केले. आभार आर. डी. बनसोडे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.