*सामाजिक न्यायाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला. विविध विषय अभ्यासले, हाताळले. आपल्या प्रखर बुद्धिमत्तेमुळे त्यांनी वंचित, उपेक्षित समूहाला तर माणसात आणण्याचं काम केलाच;शिवाय या देशातील सर्व लोकांना समान दर्जा,समान संधी,समान न्याय कसा मिळेल या साठी काम केलं, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तर आहेतच, त्याचबरोबर ते खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचे शिल्पकार व सामाजिक न्यायाचे जनक आहेत. हा त्यांचा पैलू मानवी जीवनाच्या परिवर्तनामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांना घटनात्मक अधिष्ठान दिले. जे आरक्षण, मूलभूत अधिकार सामाजिक व शैक्षणिक सोयी या पासून वंचित आहेत त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करून त्यांनी या शोषित, वंचित, पिडित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं महान कार्य केलं. आजही सामाजिक न्यायाच्या प्रत्येक चळवळीचा पाया बाबासाहेबांच्या विचारावर आधारित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जात, धर्म,...