मालवण येथे फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच यांच्यावतीने क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा
आजच्या पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून गरजेचे आहे. त्यांनी त्याकाळी हाल अपेष्टा सोसून आपल्यासाठी करून ठेवलेले कार्य लक्षात घेणे आणि त्यांच्या विचारांनुसार आपण समाजासाठी काय करू शकतो, हे ठरविणे महत्वाचे आहे. आज डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे संस्कार वर्ग चालविले पाहिजेत. डॉ. आंबेडकरांच्या विद्वत्तेचा वारसा घराघरात आला पाहिजे, असे प्रतिपादन ऍड. वैशाली डोळस यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील फुले शाहू आंबेडकर विचारमंच तर्फे आज मालवणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा झाला. यनिमित्त सकाळी मालवण एस.टी. स्टॅन्ड मागील समाज मंदिर येथे पूजा पाठ करण्यात आला. त्यानंतर एस.टी. स्टॅन्ड येथून भरड ते बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ ते बांगीवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत भव्य धम्म रॅली काढण्यात आली. पुष्पहारांनी सजविलेली डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा, निळे झेंडे, निळे फेटे, डीजेच्या तालावर वाजणारी भीमगीते या रॅलीचे आकर्षण ठरले. या रॅलीत आमदार वैभव नाईक यांनीही सहभाग दर्शवीला...