मुख्य सामग्रीवर वगळा

मालवण येथे फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच यांच्यावतीने क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा

आजच्या पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून गरजेचे आहे. त्यांनी त्याकाळी हाल अपेष्टा सोसून आपल्यासाठी करून ठेवलेले कार्य  लक्षात घेणे आणि त्यांच्या विचारांनुसार आपण समाजासाठी काय करू शकतो, हे ठरविणे महत्वाचे आहे. आज डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे संस्कार वर्ग चालविले पाहिजेत. डॉ. आंबेडकरांच्या विद्वत्तेचा वारसा घराघरात आला पाहिजे, असे प्रतिपादन ऍड. वैशाली डोळस यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील फुले शाहू आंबेडकर विचारमंच तर्फे आज मालवणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा झाला. यनिमित्त सकाळी मालवण एस.टी. स्टॅन्ड मागील समाज मंदिर येथे पूजा पाठ करण्यात आला. त्यानंतर एस.टी. स्टॅन्ड येथून भरड ते बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ ते बांगीवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत भव्य धम्म रॅली काढण्यात आली. पुष्पहारांनी सजविलेली डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा, निळे झेंडे, निळे फेटे, डीजेच्या तालावर वाजणारी भीमगीते या रॅलीचे आकर्षण ठरले. या रॅलीत आमदार वैभव नाईक यांनीही सहभाग दर्शवीला. बांगीवाडा येथे रॅलीची समाप्ती झाल्यावर त्याठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यानंतर मामा वारेरकर नाट्यगृहात जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, प्रमुख वक्त्या ऍड. वैशाली डोळस, फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष आनंद मालवणकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक वामनराव खोत, विचारमंचच्या महिला विभाग अध्यक्ष नेहा तांबे, युवामंच अध्यक्ष परेश मालवणकर आदी उपस्थित होते. आनंद मालवणकर यांनी प्रास्ताविक करत स्वागत केले. 

यावेळी मार्गदर्शन करताना ऍड. वैशाली डोळस म्हणाल्या, डॉ. आंबेडकरांनी देशातील नागरिकांना संविधानातून माणूस म्हणून जगण्याचे हक्क मिळवून दिले. समाजात महिलांना कायम दुय्यम स्थान मिळत असल्याने डॉ. आंबेडकरांनी महिलांना समानतेचा हक्क मिळवून दिला. तर त्यापूर्वी महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून क्रांती घडवली. म्हणूनच आजच्या महिलांनी या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण ठेवत त्यांच्या विचारांचे आचरण करून प्रगती साधली पाहिजे. तसेच तरुण पिढीनेही व्यसनाच्या आहारी न जाता समाजासाठी कार्यरत झाले पाहिजे, असेही ऍड. डोळस म्हणाल्या.

यावेळी आम. वैभव नाईक यांनीही विचार मांडत डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच आज माझ्या सारखा कार्यकर्ता आमदार होऊ शकला. आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन आपण सर्वांनी वाटचाल केली पाहिजे, असे सांगितले. तर वामन खोत यांनी डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर आज देश उभा आहे, त्यांच्या विचारांची, स्मरणाची ज्योत कायम तेवत ठेवली पाहिजे, असे सांगितले. तर मिलिंद जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात आजच्या पिढीने डॉ. आंबेडकरांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतले पाहिजे, समाजासाठी वेळ दिला पाहिजे, असे सांगितले.

यावेळी प्रमुख वक्त्या ऍड. डोळस यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, विद्यार्थी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मिलिंद जाधव, रंजन तांबे, मारुती सोनवडेकर, सखाराम हसोळकर, दिक्षा मालवणकर, नितेश जाधव, रामदास जाधव, सुनील देऊलकर, राजेश गुळवे, सागर जाधव, संजय कोळंबकर, श्रीकांत जाधव, स्वाती कदम, बबन मालवणकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजेंद्र कदम यांनी केले, तर आभार दर्शना गुळवे यांनी मानले.

यावेळी सिद्धार्थ जाधव, विलास वळंजू, प्रा. कैलास राबते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक मंदार केणी, नितीन वाळके, आकांक्षा शिरपूटे, उमेश मांजरेकर, रंजन तांबे, प्रा. नागेश कदम, अनुष्का कदम, आर. डी. बनसोडे, अरविंद जाधव, दीपा शिंदे, निनाक्षी शिंदे, विलास देऊलकर, संजय जाधव, विशाखा वळंजू, आदी व इतर नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.