मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्रँव्हो कमलेश.....

 काही दिवसापूर्वी ओरोस येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या कमलेश सोनावणे या मित्राची फेसबुकवर एक पोस्ट आली. घरपण द्या माझ्या घरा या अल्बममध्ये कमलेशने अभिनय केल्याची ती पोस्ट होती. त्या पोस्टखालीच कमलेशने लवकरच सरप्राईज असे लिहिले होते. त्याच्या दोन दिवसानंतर कमलेशने मला गणरायाची स्वारी या अल्बमची युट्यबची लिंक शेअर केली. त्या व्हिडीओत कमलेश अफलातून नृत्य सादर करताना दिसला. क्षणभर मला प्रश्न पडला की कमलेश नक्की काय करतो? कमलेशचे अभिनंदन करण्यासाठी मी कमलेशला फोन केला. त्यावेळी कमलेशसोबत भरभरून बोललो. फोनवर बोलताना कमलेशच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलु उलघडत गेले. कमलेशच्या व्यक्तीमत्त्वाचे पैलु सर्वांसमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठीच आजचा ब्लॉग लिहिण्याचा प्रपंच. कमलेश व निलेश या दोघेही भावांचे शिक्षण मालवणच्या भंडारी हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील त्यावेळी मालवण पोलीस ठाण्याला पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होते. बालवाडी ते सातवीपर्यंत कमलेश व निलेश भंडारी हायस्कूला होते. पाचवीत असताना आम्ही जिस देश मै गंगा रहता है या गाण्यावर नृत्य केले होते. त्यामध्ये कमलेश व निलेशने सुंदर नृत्...

अर्थशास्त्राची आवड निर्माण करणारे बांदेकर सर!

अकरावी बारावी ही दोन वर्षे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानतो. कारण अकरावीत माल अनेकांनी सायन्स घे असे सांगूनही मी स्वत:च्या निर्णयावर ठाम राहून आर्टस निवडले होते. दोन वर्षे मी भंडारी हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे तत्कालीन मुख्याध्यापक प्रा. वाय. आर. राजूरकर, प्रा. ए. व्ही. देसाई, सौ. समिता मुणगेकर मॅडम, परूळेकर सर, सौ. प्रभु मॅडम या मार्गदर्शक शिक्षक व प्राध्यापकांच्या सानिध्यात घालविली. या प्राध्यपकांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे प्रा. रूपेश बांदेकर सर. बांदेकर सर आम्हाला अकरावी बारावीला अर्थशास्त्र शिकवायचे. सरांमुळेच मला अर्थशास्त्राची आवड मला निर्माण झाली. बहुतांश अर्थशास्त्रज्ञांची नावे सरांच्या तोंडपाठ आहेत. अर्थशास्त्र अनेक सिद्धांत बांदेकर सरांनी सोप्या भाषेत करून सांगतिले. हे मीच नाही तर माझ्या बॅचचे अनेकजण सांगतील. म्हणूनच काय घटत्या उपयोतितेचा सिद्धांत आणि त्यावर सरांनी दिलेले लाडूचे उदाहरण आजही स्मरणात आहे आणि दिर्घकाळ स्मरणात राहिल. सर छोट्या छोट्या गोष्टीतून आम्हाला अर्थशास्त्र शिकवयाचे उदा. आम्हाला बारावीचा ट्रीपला जायचे होते. पण एकदम पैशाची साये होणे कठीण होते. म्हणून ब...

अंबाडा.........

                                                                   अंबाडा......... लाँकडाऊन कालावधीत बाजारात भरपूर प्रमाणात आंबाडे आले होते. मी उत्सुकता म्हणून आंबाड्यांची खरेदी केली. एक शेर पन्नास रुपये प्रमाणे मला बाजारात आंबाडे उपलब्ध झाले. घरी आणल्यावर आईने आंबाडे खारात घातले. साधारण पंधरा दिवसानंतर मी त्यातल्या एका आंबाड्याचा आस्वाद घेतला. अप्रतिम, स्वादपूर्ण असा आंबाडा होता. त्यानंतर मी आणखी दोन वेळा आंबाडे खरेदी करुन आणले आणि खारात घातले. आंबाडा या फळाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मी इंटरनेटवर शोधमोहीम राबवली. त्यातून मला खूपच इंटरेस्टिंग माहिती उपलब्ध झाली. याच माहितीच्या अनुशंगाने मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आंबाड्याचे शास्त्रीय नाव Spondias pinnata ( स्पाँडियस पिंनाटा) असे संबोधले जाते. अंबाडा हा कँश्यू या प्रवर्गात मोडतो. ग्रीक भाषेत अंबाड्याला स्पाँडियस असे संबोधतात. जगात आंबाडा हा वाईल्ड मँगो किंवा रानटी आ...

मै पल दो पल का शायर हू!

                                                      मै पल दो पल का शायर हू!  15 ऑगस्ट रोजी सायंकाळी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे सोशल मिडीयावर पोस्ट करून जाहिर केले. धोनीने मै पल दो पल का शायर हूँ! या गीताच्या साथीने निवृत्तीची पोस्ट शेअर केली. धोनीची क्रिकेट कारकिर्द प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे. रांची या गावातून आलेल्या धोनीने संपूर्ण जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली. 2007 टी 20 वल्ड कप, 2011 चा 50 षटकांचा वल्ड कप, 2013 ची चॅम्पियन ट्रॉफी आदि विजेतेपद भारताने धोनीच्या नेतृत्त्वाखाली प्राप्त केली आहेत. शांत, संयमी धोनी भारतीय संघासाठी मार्गदर्शक राहिला आहे. स्टँपच्या पाठीमागे उभा राहून संपूर्ण सामन्याची सूत्रे फिरवणारा धोनी क्रिडा रसिकांच्या कायम लक्षात राहणार आहे. 2004 मध्ये आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण करणाऱ्या धोनीने हेअर स्टाईलने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. धोनीचा हॅलिकॉप...

@30 स्वप्नांचा पाठलाग.............

                                                 @30 स्वप्नांचा पाठलाग............. माझ्या आयुष्याची तीस वर्षे आज मी पूर्ण केली. तीस वर्षात पत्रकार, शिक्षक, समतादूत, कार्यक्रम आयोजक या भूमिका मी निभावल्या. बाकीच्यांना ही करीअर वाटत असतील पण माझ्या दृष्टीने या भूमिका आहेत. कारण नाटक, एकांकिकेत जसा एखादा अभिनेता आपली भूमिका अगोदरच्या भूमिकेप्रमाणे प्रभावी व्हावी यासाठी प्रयत्न करतो तसच करीअरच्या बाबतीत आहे. गेली तीस वर्षे माझा स्वप्नांचा पाठलाग सुरु आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे कुटुंबीय, मित्र परिवार, परिवर्तनवादी समाजसुधारकांचे विचार यांचा पाठिंबा मला सातत्याने मिळाला. तीस वर्षाच्या कालावधीत काही स्वप्ने पूर्ण झाली आहेत तर अनेक स्वप्ने अपूर्ण आहेत. बार्टीत मला खऱ्या अर्थाने बुद्धाची ओळख झाली. बुद्ध हा देवाचे अस्तित्व मानत नाही. मनुष्याचे जीवन दु:खाने भरलेलेले आहे. या दु:खावर मार्ग स्वतः च काढला पाहिजे असे बुद्धाचे तत्वज्ञान सांगते. याच तत्वज्ञानाप्रमाणेच मी म...

जग बदल घालूनी घाव.........

जग बदल घालूनी घाव.........  जग बदल घालूनी घाव सांगून गेले मजला भीमराव. असे म्हणत प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंड करणारे, कष्टकरी, श्रमिकांच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडणारे साहित्यरत्न लोकशाहिर  अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 आँगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी  झाला. अण्णाभाऊसाठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे. अण्णाभाऊ साठे यांचे बालपण अतिशय गरीबी व दारिद्यात गेले. अण्णाभाऊ साठे केवळ दिड दिवस शाळेत गेले. साधारणतः अकरा ते बारा वर्षाचे असताना अण्णा आपल्या आई वडीलांसमवेत मुंबईला आले. परंतु मुंबईला आल्यावर अण्णांच्या जीवनात फारसा बदल झाला नाही. मुंबईत अण्णाभाऊ मिळेत ते काम करु लागले. मुंबई भायखळा येथे अण्णांनी मजूर, कष्टकरी यांच्या व्यथा जवळून पाहिल्या. या कालावधीत अण्णांवर कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव पडला. या काळात अण्णाभाऊंनी विविध पोवाडे रचले. कामगार चळवळीशी त्यांचा निकटचा संबंध आल्याने कामगारांचे प्रश्न त्यांनी जवळून अनुभवले. त्याचे प्रत्यंतर त्यांच्या साहित्य उमटत होते. अण्णांनी साहित्य लेखनात कष्टकरी, श्रमिक व सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी होता. कथा...