मुख्य सामग्रीवर वगळा

मै पल दो पल का शायर हू!

                                                      मै पल दो पल का शायर हू! 

15 ऑगस्ट रोजी सायंकाळी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे सोशल मिडीयावर पोस्ट करून जाहिर केले. धोनीने मै पल दो पल का शायर हूँ! या गीताच्या साथीने निवृत्तीची पोस्ट शेअर केली. धोनीची क्रिकेट कारकिर्द प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे. रांची या गावातून आलेल्या धोनीने संपूर्ण जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली. 2007 टी 20 वल्ड कप, 2011 चा 50 षटकांचा वल्ड कप, 2013 ची चॅम्पियन ट्रॉफी आदि विजेतेपद भारताने धोनीच्या नेतृत्त्वाखाली प्राप्त केली आहेत. शांत, संयमी धोनी भारतीय संघासाठी मार्गदर्शक राहिला आहे. स्टँपच्या पाठीमागे उभा राहून संपूर्ण सामन्याची सूत्रे फिरवणारा धोनी क्रिडा रसिकांच्या कायम लक्षात राहणार आहे. 2004 मध्ये आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण करणाऱ्या धोनीने हेअर स्टाईलने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. धोनीचा हॅलिकॉप्टर शॉटही अनेकांच्या पसंतीस उतरला होता. त्याचबरोबर त्याची अफलातून स्टँपिंग करण्याची स्टाईलही दिर्घकाळ स्मरणात राहणार आहे. यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करताना धोनीने आपले पाय नेहमीच जमिनीवर ठेवले. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील माणसे धोनीला आपला आदर्श मानतात. धोनीने निवृत्ती जाहिर करताना मै पल दो पल का शायर हूँ! हे गीत शेअर केले. या गीताचा अन्वयार्थ सर्वांना लागू पडणार आहे. जीवन हे आपल्याला मिळालेली एक संधी आहे. या जीवनात आपण जगून घ्यायचे. जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा. धोनी जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगला आणि इतरांनाही त्याने आनंदाने जगण्याचा सल्ला दिला आहे. धोनीने निवृत्ती जाहिर केली असली तरी चेन्नई सुपर किंग्जच्या माध्यमातून आयपीएलमध्ये दिसणार आहे. कॅप्टन कुल धोनीच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा!

                                                                                      संग्राम कासले (मालवण)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.