मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीवनात यशस्वीतेसाठी सरकारी नोकरीच हवी का?

  शालेय, महाविद्यालयीन शिक्षण सुरु असताना आणि त्यानंतर आजपर्यंत अनेक वेळा एक काँमन वाक्य ऐकायला मिळते. बाकी तुमचे सगळे ठिक आहे पण सरकारी नोकरी हवी होती? त्यामुळे प्रत्येक वेळी मनात प्रश्न निर्माण होतो कि सरकारी नोकरी मिळाली कि तो माणूस जीवनात यशस्वी होतो का? आज नक्कीच या वाक्यांचा पुन्हा विचार करण्याचा वेळ आला आहे. कारण मी अनेक वर्षे पत्रकारिता व सामाजिक उपक्रमात कार्यरत आहे. पत्रकारिता व सामाजिक उपक्रम माणसाचे जीवन यशस्वी करु शकत नाही का? महिन्याला 7 ते 8 हजार रुपये कमावणाऱ्या माणसाला समस्या, ताणतणाव असतात तशाच त्या महिन्याला लाखो, कोट्यावधी कमावणाऱ्या माणसाला असतात. परंतु दोन्ही माणसे या समस्या, तणाव यावर मात करुन महिनात सूख, दु:ख अशा वातावरणात काढत असतात. त्यामुळे सरकारी नोकरी हि माणसाच्या जीवनाचे ठरवू शकत नाही. माणसाच्या प्राथमिक गरजा भागवून आपल्या कुटुंब, मित्र परिवारासोबत आनंदात जीवन जगणे मला महत्वाचे वाटते. कमी पगार असूनही आमच्या पत्रकारिता व सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मित्रांसोबत छोटे गेट टू गेदर, चहा, नाश्ता करणे मला मनस्वी आनंद देते. कारण संकटांच्यावेळी हेच मित्र माझ्या म...

सामाजिक जाणीव

  आमचे पत्रकार मित्र सिद्धेश आचरेकर व पोलीस कर्मचारी स्वाती जाधव - आचरेकर यांची सुकन्या ज्ञानदा हिच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त आचरेकर कुटुंबियांच्यावतीने साळेल येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानदा हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानदाच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणीव ठेवून सिद्धेश आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. आचरेकर कुटुंबियांनी रक्तदानाच्या उपक्रमात सातत्य ठेवावे, ज्ञानदाला दुसऱ्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

सामाजिक समता सप्ताहानिमित्त समाजमंदिर येथे स्वच्छता मोहिम

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागअंतर्गत सामाजिक समता सप्ताहानिमित्त समाजकल्याण सिंधुदुर्ग, मालवण नगरपरिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह व बार्टी यांच्यावतीने मालवण एसटी स्टँड येथील समाजमंदिर येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी वसगीगृहाचे गृहपाल के. एस. इंदलकर, संग्राम कासले, कर्मचारी सिद्धीविनायक चिपकर, मयुर कदम, अमित जाधव, मयुरेश सावंत, नगरपरिषद कर्मचारी विश्राम जाधव, मिथुन शिगले, नरेश वायंगणकर, सुनिल देऊलकर, हेमंत वायंगणकर, आदि उपस्थित होते. यावेळी साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊसाठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत मालवण एसटी स्टँड ते दलितवस्ती रस्ता रूंदीकरण व पेव्हर ब्लॉक व क्रांक्रिटीकरण करणे या विकासकामाचा लाभ घेतलेल्या नागारिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दिपक घाटे यांच्या मागदर्शनाखाली सदरचा कार्यक्रम राबविण्यात आला.

मूगाची कचोरी

 आमचे मित्र तुषार लिंगायत यांनी उपवासासाठी मूगाची कचोरी हा पदार्थ बनविला होता. त्याचा आम्ही आस्वाद  घेतला. पदार्थ अतिशय सुंदर झाला होता. संपर्क -9623542304

महात्मा फुले व डाँ. आंबेडकर जयंतीनिमित्त रँली

  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचच्यावतीने मालवण शहरात भव्य रँली काढण्यात आली. या रँलीत धम्मबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मालवण एसटी स्टँड समाजमंदिर येथून बांगीवाडा डाँ. आंबेडकर पुतळापर्यंत हि रँली काढण्यात आली. या रँलीमध्ये आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते. या चित्ररथांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.

कोळंब येथे महात्मा फुलेंना अभिवादन!

 महात्मा फुले जयंतीनिमित्त प्राथमिक शाळा कोळंब कातवड येथे महात्मा फुलेंच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापक कनेरकर सर, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

डाँ. आंबेडकर यांना अनोखी मानवंदना

   भारतीय संविधानाचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त कट्टा वराडकर हायस्कूलचे कला शिक्षक समीर अशोक चांदेरकर यांनी पिंपळाच्या पानात डाँ.आंबेडकर यांचे चित्र कोरून त्यांना मानवंदना दिली आहे. चांदेरकर यांनी डाँ. आंबेडकर यांना दिलेल्या अनोख्या मानवंदनेचे कौतुक होत आहे.

सलग 18 तास वाचन स्पर्धेत विनिता पांजरी प्रथम

  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) समतादूत प्रकल्प सिंधुदुर्ग आणि बॅ नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक समता सप्ताहानिमित्त साने गुरूजी वाचन मंदिर आयोजीत सलग 18 तास वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विनिता पांजरी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त आहे.  स्पर्धेचे उद्घाटन अँड. सुदीप कांबळे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. सलग वाचन उपक्रमामध्ये एकूण 18 स्पर्धक सहभागी झाले होते. विनिता पांजरी यांनी सलग दहा तास वाचन केले. गायत्री गावकर यांनी नऊ तास आणि संचिता कांदळकर यांनी अनुक्रमे सात तास, वाचन केले. सकाळी 8. 30 ते सायंकाळी 6.30 अशी सलग वाचन स्पर्धेची वेळ निश्चित करण्यात आली होती. वाचकांना बार्टी तर्फे भेटवस्तू आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. साने गुरुजी वाचन मंदिरच्यावतीने विजेत्यांना युवा साधनाचा अंक भेट देण्यात आला. वाचकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांन...

सामाजिक समता सप्ताहानिमित्त पथनाट्याचे सादरीकरण

    समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्हय़ात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक समता सप्ताहानिमित्त मालवण तालुक्यातील विविध भागांमध्ये पथनाटय़ाचे सादरीकरण करण्यात आले. या पथनाटय़ामध्ये बार्टीच्या समतादूतांनी सहभाग घेतला होता. मालवण शहर, मालवण फोवकांडा पिंपळ, वायरी भूतनाथ, समाजकल्याण वसतीगृह येथे पथनाटय़ाचे सादरीकरण करण्यात आले. या पथनाटय़ातtन समाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती तसेच समाजसुधारकांच्या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. पथनाटय़ामध्ये बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम, अँड. सुदिप कांबळे, सुजित जाधव, श्यामल सावंत, सगुण जाधव, राजू दिनदयाळ, सुहास मोचेमाडकर, संग्राम कासले यांनी सहभाग घेतला होता. यावेळी अँड. सुदिप कांबळे यांनी प्रबोधन गीते सादर केली. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त दिपक घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक समता सप्ताहाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत

निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांच्या समतादूत प्रकल्पाअंतर्गत जिल्हय़ात सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बार्टीतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना साने गुरूजी वाचन मंदिर येथे रोख पारितोषिक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात निबंध स्पर्धेतील विजेती श्रद्धा पाटकर, शितल कदम, माधवी तिरोडकर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम, अँड. सुदिप कांबळे, सुजित जाधव, सगुण जाधव, श्यामल सावंत, राजू दिनदयाळ, संग्राम कासले, ऋतुजा केळकर, मेघना जोशी, संजयकुमार रोगे तसेच वाचन मंदिराचे कर्मचारी उपस्थित होते. समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दिपक घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली समता सप्ताहाच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

डाँ. आंबेडकर भारतीयांसाठी प्रेरणास्थान - प्रा. नागेश कदम

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून शैक्षणिक वाटचाल करावी असे प्रतिपादन सुनितादेवी अध्यापक महाविद्यायलाचे प्रा. नागेश कदम यांनी मालवण येथील शासकीय मुलांचे वसतीगृह येथे सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजीत कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्तम शासकीय मुलांच्या वसतीगृह येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. नागेश कदम हे बोलत होते. यावेळी वसगीगृहाचे गृहपाल के. एस. इंदलकर, संग्राम कासले, सिद्धीविनायक चिपकर, मुकेश सावंत, अमित जाधव आदि उपस्थित होते. प्रारंभी संतोष डोईफोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. नागेश कदम यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रा. नागेश कदम म्हणाले, विद्यार्थी अवस्थेत विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या अवस्थेत आपल्याला अनेक मोहाचे क्षण न...

बार्टीच्या निबंध स्पर्धेत श्रद्धा पाटकर प्रथम

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) समतादूत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यावतीने सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजीत जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर झाला आहे. निबंध स्पर्धेत कणकवली येथील श्रद्धा सतीश पाटकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. कुडाळ येथील शितल किरण कदम यांनी द्वितीय तर मालवणच्या माधवी लिलाधर तिरोडकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्रकारीतेतील योगदान असा निबंध स्पर्धेचा विषय होता. स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निबंध स्पर्धेला मिळाला. स्पर्धेचे परीक्षण डी. एड. कॉलेज मालवणचे प्राध्यापक नागेश कदम यांनी केले. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्हय़ातील सर्व समतादूतांनी मेहनत घेतली.

बार्टीतर्फे सलग 18 तास वाचन उपक्रम

  डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) समतादूत प्रकल्प सिंधुदुर्ग व सानेगुरुजी वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक समता सप्ताहानिमित्त 10 एप्रिल रोजी साने गुरुजी वाचन मंदिर मालवण येथे सलग 10 ते 18 तास वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाचन स्पर्धेची वेळ सकाळी 9 ते रात्री  9 अशी असणार आहे. 12 तास, 10 तास व 8 तास सलग वाचन करणाऱ्या स्पर्धकांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमात विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी विजय कदम यांनी केले आहे. नावनोंदणी श्यामल सावंत 9420726374

14 रोजी मालवणात डाँ. आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती महोत्सव

 फुले, शाहू, विचारमंच मालवण यांच्यावतीने 14 एप्रिल रोजी मामा वरेरकर नाटय़गृह मालवण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे. संयुक्त जयंतीनिमित्त मालवणमध्ये 14 व 15 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 14 रोजी सकाळी 8 ते 9 वाजता एस. टी. स्टँड येथील समाजमंदिर येथे धम्म ध्वजारोहण व पूजापाठ, रॅली - सकाळी 9 ते 10.30 वाजता (समाजमंदिर एस. टी. स्टँड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बांगीवाडा), सकाळी 11 ते 1.30 वाजता मामा वरेरकर नाटय़गृह येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यक प्रा. डॉ. राजन गवस उपस्थित राहणार आहेत. सभेच्या अध्यक्षस्थानी किशोर चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास आधिकारी जे. पी. जाधव तसेच दोडामार्ग गटविकास अधिकारी मिलींद जाधव, नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारी 1.30 ते 2.30 स्नेहभोजन, दुपारी 2.30 वाजता स्वरनिनाद कट्टा निर्मित ऑक्रेस्टा क्रांतीसूर्य हा भिमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. 15 रोजी रात्री 9.30 वाजता एस. टी. स्टँड समाजमंदिर येथे स्थानिक कलाकारांच...

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

  महाविद्यालयातील अनु.जाती, इमाव, विमाभज व विशेष मागास प्रवर्गातील सन 2020-21 व 2021-22 करिता महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी व जुन्या अर्जाच्या नुतनीकरणासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. हि प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवलरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु असल्याचे दिपक घाटे, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांनी कळवले आहे. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांनी जे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज व जुन्या अर्जाचे नुतनीकरण 30 एप्रिलपर्यंत करावेत. विद्यार्थ्यांचे अर्ज विहीत मुदतीत भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. या योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास त्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी दूरध्वनी क्र. 02362-228882 येथे संपर्क साधवा.