भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त बार्टीच्या समतादूतांच्यावतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि निबंध स्पर्धा खुली असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पत्रकारीतेतील योगदान' असा निबंध स्पर्धेचा विषय असून शब्दमर्यादा 500 ते 1000 शब्दापर्यंत आहे. स्पर्धकांनी निबंध स्वहस्ताक्षरात लिहून किंवा टाईप करून श्यामल सावंत (9420726374) यांच्या व्हॉटसअप क्रमांकावर 4 एप्रिलपर्यंत पाठवावेत. स्पर्धेतील विजेत्यांना 1000 रूपये, 700 रूपये, 500 रूपये तसेच प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.