'पूरा नाम मनोज अरविंद चव्हाण' बहुतेक वेळा फोनवर मनोज अशीच आपली ओळख सांगतो. मनोज अरविंद चव्हाण या नावात पत्रकारिता, मैत्री, आपुलकी, योग्य पद्धतीने काम न करणाऱ्या प्रशासनाविरुद्धचा रोष, क्रिकेट आणि बरच काही सामावल आहे. 1997 पासून ते आजातागातय मालवणने मनोजमधले अनेक पैलु पाहिले आहेत. बातमीपर्यंत सर्वात अगोदर पोहचणे हि मनोजची खासियत आहे. त्यात जर क्राईमची बातमी असेल तर मनोज आणखी वेगाने बातमीपर्यंत पोहचतो. अपघात, खून, गळफास, अपहार या बातम्या मनोज ज्या पद्धतीने लिहितो त्याला तोड नाही. क्राईमच्या प्रत्येक बातमीत त्याने केलेले निरीक्षण दिसून येते. कुठलीही बातमी पोलीस स्टेशनला येऊन संपणार आहे, त्यामुळे क्राईमच्या बातमी मागे रहा असे तो नेहमी सांगतो. पत्रकाराने बातमी लिहणे हे सोपे असते पण ती बातमी विविध सोर्सच्या आधारे लवकरात लवकर मिळवणे हे कौशल्याचै काम आहे. मनोजने हे कौशल्य आत्मसात केले आहे. मनोजचा जनसंपर्क मोठा आहे. हाच जनसंपर्क त्याला बातमीपर्यंत घेऊन जातो. मालवण हे पर्यटन स्थळ असल्याने देश विदेशातील पर्यटक येथे येतात. मालवण समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक बुडाल्याच्या अनेक घटना घडत असतात. ...