मुख्य सामग्रीवर वगळा

आमचे सामंत सर........


 आठवी ते दहावी या कालावधीत सामंत सर आम्हाला भंडारी हायस्कूलमध्ये गणित हा विषय शिकवायचे. गणित हा विषय माझा नावडता विषय. आजही गणिते सोडवताना मला तणाव येतो. परंतु सामंत सरांच्या शिकवणीच्या पद्धतीमुळे गणित, भूमिती विषयाची थोडीफार आवड निर्माण झाली होती. तीन वर्षात सामंत सरांची वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये पाहता आली. सामंत सरांचे अक्षर अतिशय सुंदर आहे. सामंत सरांची स्टायलिश सही वहीवर घेण्यासाठी आम्ही सर्व मित्र मैत्रिणी भंडारी हायस्कूलच्या स्टाफरुममध्ये रांगा लावत असू. कितीही गर्दी असली तरी सामंत सर प्रत्येकाची गणिताची वही तपासून काळ्या जेल पेनने सही करत असत. सामंत सर वर्गात येतानाच एक अनोखा उत्साह घेऊन वर्गात येत असत. सरांना वर्गात खुर्चीवर बसलेले आम्ही पाहिले नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बेंचकडे जाऊन गणिते समजावणे हे सरांचे वैशिष्ट्य. सर वर्गात फळ्यावर गणित सोडवून पूर्ण फळा भरुन टाकत. सरांची फळ्यावर गणिते सोडविण्याची पद्धत, फलकलेखन यामुळे सरांची मुलांमध्ये वेगळीच क्रेझ होती. नववीत असताना आम्ही सर्व मित्र रविवारी गणिते सोडविण्यासाठी सायकलने देवबाग येथील सामंत सरांच्या घरी गेलो होतो. सकाळी आम्ही 9 वाजण्याच्या सुमारास सायकलने सामंत सरांच्या घरी पोहचलो. त्यावेळी सर घरी नव्हते ते कोणत्या तरी कामानिमित्त बाहेर गेले होते. परंतु सरांनी आईकडे निरोप देऊन ठेवला होता मी येईपर्यंत मुलांना गणिते सोडविण्यास सांगणे. त्यावेळेस हंगामा चित्रपट आला होतो. सरांच्या घरी असलेल्या टीव्हीवरही रविवारी तो चित्रपट लागला होता. परंतु तो चित्रपट पाहण्याचे आमचे धाडस झाले नाही. पण आमचे परममित्र टायटस फर्नांडिस यांनी चित्रपट लावण्याचे धाडस केले. आम्ही लपून छपून हंगामा चित्रपट थोडाफार पाहिला. तेवढ्यात सामंत सरांची आई घरातून बाहेर आली, सरांका सांगतलय तुम्ही अभ्यास सोडून पिक्चर बघतास ते? त्यानंर आम्ही टीव्ही बंद करुन गणिते सोडवू लागलो. परंतु आमचे लक्ष हंगामा पिक्चरकडेच अधिक होते. बऱ्याच अवधीनंतर सामंत सर आले. त्यांना आम्ही गणिते सोडवताना दिसलो. आम्ही केलेला प्रताप सरांना समजला असेल की नाही हे अजूनही आम्हाला समजले नव्हते. सर भंडारी हायस्कूलमधून सेवानिवृत्त झाले आहेत, पण सेवानिवृत्त झाल्यासारखे वाटत नाहीत. सरांच्या घरी गेलात तर सर त्यांचा वाडा तुम्हाला फिरवून दाखवतील. राजकारण, समाजकारण, शैक्षणिक आदि बाबींवर सर मनसोक्त बोलतात. मुलांना शैक्षणिक मदत करणे, मुलांची आर्थिक परिस्थिती समजून स्वतःच्या ओमनीतून शालेय मुलांना देवबागहून शाळेत आणणे यासाठी सर आमच्या मनात आहेत. सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!  

                        संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.