मुख्य सामग्रीवर वगळा

जग बदल घालूनी घाव.........


जग बदल घालूनी घाव.........
 जग बदल घालूनी घाव सांगून गेले मजला भीमराव. असे म्हणत प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंड करणारे, कष्टकरी, श्रमिकांच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडणारे साहित्यरत्न लोकशाहिर  अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 आँगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी  झाला. अण्णाभाऊसाठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे. अण्णाभाऊ साठे यांचे बालपण अतिशय गरीबी व दारिद्यात गेले. अण्णाभाऊ साठे केवळ दिड दिवस शाळेत गेले. साधारणतः अकरा ते बारा वर्षाचे असताना अण्णा आपल्या आई वडीलांसमवेत मुंबईला आले. परंतु मुंबईला आल्यावर अण्णांच्या जीवनात फारसा बदल झाला नाही. मुंबईत अण्णाभाऊ मिळेत ते काम करु लागले. मुंबई भायखळा येथे अण्णांनी मजूर, कष्टकरी यांच्या व्यथा जवळून पाहिल्या. या कालावधीत अण्णांवर कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव पडला. या काळात अण्णाभाऊंनी विविध पोवाडे रचले. कामगार चळवळीशी त्यांचा निकटचा संबंध आल्याने कामगारांचे प्रश्न त्यांनी जवळून अनुभवले. त्याचे प्रत्यंतर त्यांच्या साहित्य उमटत होते. अण्णांनी साहित्य लेखनात कष्टकरी, श्रमिक व सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी होता. कथा, कादंबरी, पोवाडे, लावण्या, प्रवासवर्णन आदि साहित्य प्रकारांचे अण्णांनी लेखन केले. माक्सवादाप्रमाणेच अण्णांवर आंबेडकरवादाचाही प्रभाव होता. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित जातीव्यवस्थेविरूद्ध बंड केले होते. म्हणून तर आंबेडकरवादाने प्रभावित झालेले अण्णाभाऊ एके ठिकाणी म्हणतात, जग बदल घालूनी घाव। सांगून गेले मला भीमराव। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर अण्णांनी रचलेली मैना या लावणीला रसिकांनी भरभरून दाद दिली. अण्णाभाऊ साठे यांनी विपुल लेखन केले आहे. आपल्याला जर कष्टकरी, श्रमिक, दिनदलितांचे प्रश्न समजून घ्यायचे असतील तर अण्णाभाऊ साठेंच्या समग्र साहित्याचे वाचन करणे आवश्यक आहे. - संग्राम कासले, मालवण 
 (संदर्भ - विद्रोही कलावंत अण्णाभाऊ साठे, लेखक - डाँ. राजेश्वर दूडूकनाळे)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.