मुख्य सामग्रीवर वगळा

समुपदेशन म्हणजे काय?

नमस्कार आम्ही संग्राम सतीश कासले. माझे शिक्षण एम. ए.बी. एड, मास कम्युनिकेशन इन जर्नालिझम, एम. एस. डब्ल्यू झाले आहे. सध्या माझे एलएलबीचे शिक्षण सुरू आहे. मी मलेवाड पंचक्रोशी हायस्कूल येथे तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम केले आहे. मी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन करतो. हे समुपदेशन करत असताना अनेकजण प्रश्न विचारतात की समुपदेशन म्हणजे नक्की काय? त्यामुळे त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आम्ही विशेष ब्लॉग बनवला आहे. माझ्या मते समुपदेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीशी संवाद साधणे. आता हा संवाद का साधावा लागतो. तर सध्याचे मनुष्याचे जीवन हे फार वेगवान झालेले आहे. त्यामुळे मनुष्य अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. त्यापैकी ताणतणाव ही सध्याच्या काळातील माणसाची एक प्रमुख समस्या. आणि याच ताणतणावामुळे माणसाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याच समस्यांवर आपल्याला उपाय शोधायचा आहे किंवा माणसांना बोलत करायचा आहे. यासाठीच समुपदेशनाच्या आवश्यकता असते. मला या सर्वांमध्ये विद्यार्थी समुपदेशन हे अतिशय महत्त्वाचे वाटते. कारण सध्या मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा हे जग विस्तारत चालल्यामुळे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने समुपदेशनाची गरज आहे. त्यातच कोणतं करिअर निवडावं? आपली आवड कशात आहे? आपण निवडलेल्या करिअरमध्ये भविष्यात यशस्वी होऊ की नाही यासारख्या अनेक शंका विद्यार्थी व पालकांच्या मनात असतात. या समस्यांवर मार्गदर्शन व काही प्रमाणात उपाय करण्यासाठी समुपदेशन हे अतिशय आवश्यक असते. आता या समुपदेशनाची फि आहे अतिशय कमी ठेवलेली आहे. आपण या समुपदेशनाची फी पाचशे रुपये एवथठेवलेली आहे. यामध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करायचे आहे त्यांच्याशी तीन वेळा संवाद साधतो. हा संवादाचा कालावधी पंधरा दिवसाच्या अंतराचा असतो. म्हणजेच पंधरा दिवसाच्या अंतराने तीन वेळा आपण त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. व त्याच्या समस्यांचे निराकरण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आपण अशा प्रकारचे कार्यक्रम शाळेवर देखील घेऊ शकतो. त्यामुळे या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना समुपदेशनाची आवश्यकता आहे त्यांनी खालील दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा. संग्राम सतीश कासले 
9420824874

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.