माझ गाव वडाचापाट.....
माझे मुळ गाव वडाचापाट. मालवणपासून 17 किमीवर आहे. वडीलांची नोकरी, आमचे शिक्षण या कारणांमुळे आम्ही मालवण येथे राहिलो. वडाचापाट येथे लहानपणी शाळेला मे महिन्यात सुट्टी असताना आम्ही सर्वजण गावी जायचो. पण त्यानंतर शिक्षण आणि रिपोर्टींगमुळे वडाचापाटला जाता येत नव्हते. गेलो तर एका दिवसातच परत यावे लागे. शनिवारी आजीची औषधे देण्यासाठी वडाचापाटला जाण्याची संधी मिळाली. शनिवारी सकाळी आकाशात पावसाचे वातावरण तयार झाले होते. परंतु सकाळी 9.30 वाजता आकाशात सुर्य दिसू लागला. त्यामुळे मी माझी प्लेझर गाडी बाहेर काढली. मास्क, रेनकोट परिधान करुन वडाचापाटला जाण्यासाठी निघालो. आडारी पूलापासून ते वडाचापाट पर्यंतचा प्रवास निसर्गाच्या सानिध्यातला होता. दोन्ही बाजूला गर्द झाडी, अधूनमधून पडणारा पाऊस, खळाळत वाहणारे ओढे मनात साठवत वडाचापाटला पोहचलो. वाटेत काही ठिकाणी शेतकरी शेताची कामे करताना दिसले. दरमजल करीत मसदे येथे पोहचलो. त्यानंतर आमच्या घरी जाण्यासाठी झरी येथील रस्त्यावर आलो. परंतु वहाळाला भरपूर पाणी आल्याने तिथून जाता आले नाही. त्यामुळे गाडी मागे घेऊन कुंभयातून आमच्या घरी पोहचलो. घरी आजीला औषधे दिली. काही वेळा निवांतपणे घरी बसलो. आमच्या घराशेजारील समीरच्या आईने हाक मारली, काय रे आई बरी आसा ना! मी तीला हो असे उत्तर दिले. समीरच्या आईला पाहताना जुन्या आठवणी दाटुन आल्या. समीर माझा बालपणीचा मित्र. मी गावी जायचो तेव्हा आवर्जून समीरसोबत क्रिकेट खेळायचो. पण 2011 मध्ये अपघातात समीरचा मृत्यू झाला. आता फक्त समीरच्या आठवणी मनात साठून राहिल्या आहेत. समीरची आई जेव्हा हाक मारते. तेव्हा आठवणी पुन्हा जाग्या होतात. आमच्या घरासमोरील फणसाचे झाड आहे. बालपणीचे खेळण्याचे ठिकाण. बालपणी आम्ही फसणाच्या झाडाखाली खेळायचो. मी गेली तीस वर्षे फणसाचे झाड पाहतोय अजूनही हे झाड तसेच आहे. आतेने दिलेला चहा, बिस्कीट खाऊन आजी, आत्तेचा निरोप घेऊन मालवणला जाण्यासाठी परत निघालो. वाटेत येताना आमच्या बागेपाशी थांबलो. बागेच्या शेजारी एक ओढा वाहतो. ओढ्याला आज भरपूर पाणी होते. त्यामुळे ओढ्यापाशी न थांबता मालवणच्या दिशेने निघालो. दोन तासाच्या प्रवासात अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
माझे मुळ गाव वडाचापाट. मालवणपासून 17 किमीवर आहे. वडीलांची नोकरी, आमचे शिक्षण या कारणांमुळे आम्ही मालवण येथे राहिलो. वडाचापाट येथे लहानपणी शाळेला मे महिन्यात सुट्टी असताना आम्ही सर्वजण गावी जायचो. पण त्यानंतर शिक्षण आणि रिपोर्टींगमुळे वडाचापाटला जाता येत नव्हते. गेलो तर एका दिवसातच परत यावे लागे. शनिवारी आजीची औषधे देण्यासाठी वडाचापाटला जाण्याची संधी मिळाली. शनिवारी सकाळी आकाशात पावसाचे वातावरण तयार झाले होते. परंतु सकाळी 9.30 वाजता आकाशात सुर्य दिसू लागला. त्यामुळे मी माझी प्लेझर गाडी बाहेर काढली. मास्क, रेनकोट परिधान करुन वडाचापाटला जाण्यासाठी निघालो. आडारी पूलापासून ते वडाचापाट पर्यंतचा प्रवास निसर्गाच्या सानिध्यातला होता. दोन्ही बाजूला गर्द झाडी, अधूनमधून पडणारा पाऊस, खळाळत वाहणारे ओढे मनात साठवत वडाचापाटला पोहचलो. वाटेत काही ठिकाणी शेतकरी शेताची कामे करताना दिसले. दरमजल करीत मसदे येथे पोहचलो. त्यानंतर आमच्या घरी जाण्यासाठी झरी येथील रस्त्यावर आलो. परंतु वहाळाला भरपूर पाणी आल्याने तिथून जाता आले नाही. त्यामुळे गाडी मागे घेऊन कुंभयातून आमच्या घरी पोहचलो. घरी आजीला औषधे दिली. काही वेळा निवांतपणे घरी बसलो. आमच्या घराशेजारील समीरच्या आईने हाक मारली, काय रे आई बरी आसा ना! मी तीला हो असे उत्तर दिले. समीरच्या आईला पाहताना जुन्या आठवणी दाटुन आल्या. समीर माझा बालपणीचा मित्र. मी गावी जायचो तेव्हा आवर्जून समीरसोबत क्रिकेट खेळायचो. पण 2011 मध्ये अपघातात समीरचा मृत्यू झाला. आता फक्त समीरच्या आठवणी मनात साठून राहिल्या आहेत. समीरची आई जेव्हा हाक मारते. तेव्हा आठवणी पुन्हा जाग्या होतात. आमच्या घरासमोरील फणसाचे झाड आहे. बालपणीचे खेळण्याचे ठिकाण. बालपणी आम्ही फसणाच्या झाडाखाली खेळायचो. मी गेली तीस वर्षे फणसाचे झाड पाहतोय अजूनही हे झाड तसेच आहे. आतेने दिलेला चहा, बिस्कीट खाऊन आजी, आत्तेचा निरोप घेऊन मालवणला जाण्यासाठी परत निघालो. वाटेत येताना आमच्या बागेपाशी थांबलो. बागेच्या शेजारी एक ओढा वाहतो. ओढ्याला आज भरपूर पाणी होते. त्यामुळे ओढ्यापाशी न थांबता मालवणच्या दिशेने निघालो. दोन तासाच्या प्रवासात अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
संग्राम कासले, मालवण

रम्य ते बालपण
उत्तर द्याहटवा