मुख्य सामग्रीवर वगळा

लेट पण थेट.........


लेट पण थेट.........
लेट पण थेट या वाक्याने समतादूत प्रकल्पाच्या पुणे येथील कार्यशाळेत अनेकांच्या मनावर गारुड केल होते. समतादूत प्रकल्पात असणाऱ्या अनेकांना हे वाक्य आजही स्मरणात असेल. आमचा माजी समतादूत सहकारी, पत्रकार आणि सध्या कोकण नाऊ चँनेलचा ब्युरो चीफ साईनाथ गावकरचे हे पेटंट वाक्य. दोन दिवसापूर्वी साईने नवीन फोर व्हीलर गाडी घेतली आणि त्याने सिद्ध केले ते म्हणजे लेट पण थेट. साईसोबत माझी ओळख समतादूत प्रकल्पात झाली. रायगडमध्ये माझ्या सोबत श्रीवर्धन तालुक्यात त्याने समतादूत म्हणून काम केले. साईच्या काही गोष्टी मला आवडत नाहीत त्या म्हणजे उशिरा उठणे, एखाद्या गोष्टीची तयारी फार उशिरा करणे. पण तरीही साई ग्रेट आहे. तो कोणतीही गोष्ट बिनधास्तपणे करतो. ज्या ठिकाणी अन्याय दिसेल त्या ठिकाणी लेखणी आणि आता चँनलच्या माध्यमातून तो अन्यायाला वाचा फोडतो. साईचा जनसंपर्क मोठा आहे. जनसंपर्काची व्याप्ती सिंधुदुर्गातच नाही तर ती अनेक जिल्ह्यामध्ये आहे. साई आपले मत एखाद्या व्यक्तीला ठामपणे पटवून देऊ शकतो. त्याचबरोबर तो एखाद्या व्यतीचे तो मतपरिवर्तनही करु शकतो. ज्या माणसांना साई भेटतो त्यांच्या तो थेट ह्दयात शिरतो हे साईचे वैशिष्ट्य आहे. साईने आपल्या वैयक्तिक जीवनात खूप मोठे स्ट्रगल केले आहे. पत्रकारिता, फोटोग्राफी, मार्केटिंग एजन्सी, समतादूत पुन्हा पत्रकारिता असे साईचे स्ट्रगलिंग आहे. साईने अनेक संकटाचा सामना करुन सध्याची मजल मारली आहे. त्यामुळे आज या क्षणी साई मला ग्रेट वाटतो. साईची आई, वडील या दोघांवर नितांत श्रद्धा आहे. तो जीवनात सार काही मिळवतो ते आई वडीलांसाठीच असे मला प्रत्येक क्षणी वाटते. भाऊबीज प्रत्येक जण साजरी करतात पण बहिणबीज साजरी करुन बहिणीचा सन्मान करणारा साई ग्रेट आहे. कधी कधी साईचा स्वभाव मला आवडत नाही. त्याचे विचारही मला काही वेळेस पटत नाही. परंतु परिस्थितीचा बाऊ न करता एक सर्वसामान्य मुलगा सोशल मिडीयात जी भरारी घेत आहे ती कौतुकास्पद आहे. भले तो लेट असेल पण तो थेट आहे.
 संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.