मुख्य सामग्रीवर वगळा

भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संघर्ष..........


भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संघर्ष..........
आज जिल्ह्यातील वृतपत्रातून भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची व्यथा मांडणारी बातमी प्रसिद्ध झाली. राज्यातील भूविकास बँकेचे सद्यस्थितीतील 1160 कर्मचारी हालाखीचे जीवन जगत आहेत. भूविकास बँकेचे अनेक प्रश्न मी जवळून अनुभवले आहेत. कारण माझ्या वडिलांनी भूविकास बँकेत कर्मचारी म्हणून सेवा बजावली आहे. 1997-98 भूविकास बँकाना करण्यात येणारा कर्जपुरवठा बंद करण्यात आला. यानंतर भूविकास बँकेची आर्थिक स्थिती बिघडत गेली. 1999 -2000 पासून कर्मचाऱ्यांच्या पगाराचे गणित बिघडले. त्यामुळे त्याचा परिणाम भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर होऊ लागला. मुलांची शिक्षणे, लग्न, आजारपणासाठी औषधोपचार यासाठी भूविकास बँकेचे अनेक कर्मचारी कर्जबाजारी झाले. अनेकांना दागिने गहाण ठेवावे लागले. एकिकडे पगार होत नव्हते तर दुसरीकडे घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नव्हती. परंतु याही कठीण परिस्थिती भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. प्रसंगी कर्ज काढून मुलांना शिकवले. 2015 साली भूविकास बँक बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या कठीण कालावधीत काही कर्मचारी नियत वयोमानानुसार निवृत्त झाले तर काहींनी स्वेच्छा सेवानिवृत्त घेतली. परंतु भूविकास बँकेचा कर्मचारी आजही संघर्ष करत आहे. बँकेचा कर्मचारी म्हणून काम करत असताना तो अवेळी होणाऱ्या पगारासाठी संघर्ष करत होता. तर आता सेवानिवृत्तीनंतर  हक्काची आर्थिक देणी मिळण्यासाठी संघर्ष करत आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अनेक राजकीय, सामाजिक कार्यत्यांच्या भेटी घेतल्या. परंतु भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचे घोंगडे भिजतच राहिले. 1997 पासून आजतागायत अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु कोणत्याही सरकारने भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावेत आणि त्यांच्या आर्थिक समस्या दूर व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले नाहीत हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. परंतु भुविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि कर्मचारी संघटनांनी सनदशीर मार्गाने आपले प्रश्न मांडण्याचा मार्ग सोडला नाही.  भूविकास बँकेच्या अनेक कर्मचाऱ्यांची वये आज 50 च्या पुढे आहेत. परंतु प्रलंबित प्रश्नांसाठी ते अजूनही जिद्दीने लढत आहेत.  त्यांचा लोकशाही व्यवस्थेवर विश्वास आहे. म्हणून भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित प्रश्न सुटले नाही तर मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र शासनाने भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला न्याय मिळवून द्यावा हिच अपेक्षा! 
संग्राम कासले, मालवण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.