संदर्भासह स्पष्टीकरण....
काही दिवसांपूर्वी दहावीचे मराठीचे पुस्तक आँनलाईन पाहिले. पुस्तकात संदर्भासह स्पष्टीकरण हा प्रश्न दिसला नाही. त्यामुळे काही शिक्षकांशी चर्चा केली. चर्चेतून असे लक्षात आले की नवीन अभ्यासक्रमात संदर्भासह स्पष्टीकरण या प्रश्नाचा समावेश नाही. मला शालेय जीवनातील संदर्भासह स्पष्टीकरण या प्रश्नाची आठवण झाली. भंडारी हायस्कूलमध्ये असताना आम्हाला काही दिवसांसाठी आव्हाड सर नावाचे शिक्षक शिकवायला आले होते. त्यांनी फळ्यावर संदर्भ, स्पष्टीकरण, वैशिष्ट्ये असे लिहून एक नमुना आम्हाला दाखवला होता. त्यावरुन आम्ही थोडेफार संदर्भासह स्पष्टीकरण लिहायला शिकलो होतो. परंतु खऱ्या अर्थाने आम्हाला ध्रुवकुमार रानडे सरांनी संदर्भासहित स्पष्टीकरण हा प्रश्न सोडवायला शिकवला. दहावीत रानडे सरांनी आमच्याकडून प्रत्येक पाठ आणि कवितेचा सारांश दोन ते तीन ओळीत लिहून घेतला होता. त्यामध्ये पाठाचे नाव, लेखकाची माहिती, पाठाची थोडीशी माहिती अशा संदर्भाचा समावेश असायचा. सरांनी सर्व पाठ, कविता यांचे लेखक, कवी आमच्याकडे तोंडपाठ करुन घेतले होते. सरांचे असे म्हणणे होते की लेखकाचे नाव पाठ झाले की, लेखकाला पाठात काय सांगायचे आहे. एखादे वाक्य कशाच्या अनुषंगाने वापरले आहे. याचा उलघडा तुम्हाला होईल व त्यानुसार तुम्ही वाक्याचे स्पष्टीकरण व वैशिष्ट्य लिहू शकाल. त्याचा परिणाम असा झाला की मराठी प्रश्नपत्रिकेमधील अनेक प्रश्नांची तयारी झाली. म्हणजे संदर्भासही स्पष्टीकरण, दिर्घोत्तरी प्रश्नांची प्रस्तावना, लघुत्तरी प्रश्नांचा आशय अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्हाला त्यातून उलघडत गेली. त्यामुळे मराठीचा पेपर आमच्यासाठी सोपा जात असे. रानडे सरांच्या या क्लुप्तीचा वापर मी मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल येथे शिक्षण सेवक म्हणून कार्यरत असताना केला. सरांची क्लुप्ती तिथेही यशस्वी ठरली होती. 2012 ते 2014 या कालावधीत मराठी विषयाचा निकाल 100 टक्के लागला होता. तसेच अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले होते. लाँकडाऊन कालावधीत सर भाजी खरेदीसाठी बजारात येतात. माझ्या चेहऱ्यावर मास्क असेल तरीही ते मला बरोबर ओळखतात. माझी, निखिलची आवर्जुन चौकशी करतात. माझा लेख आवडला तर प्रसाद, करुणाला अवश्य सांगतात. असे ह न विसरता येणार आगळ वेगळ संदर्भात स्पष्टीकरण आहे.
(संग्राम कासले, मालवण)

atyanta sundar mitra...Tujhi lihinyachi paddhat mala khup avadte ...aapulki diste tyat nehami
उत्तर द्याहटवाहोय संग्राम सरांची हसत खेळत शिकवण्याची पद्धत अतीशय लोभसवाणी असे.माझ्यासाठी त्यांच्या ओळी असायच्या.. 'बालपणीचा काळ सुखाचा'. ह्याचा नेमका अर्थ संग्राम तुला आणि पहीलीतील काही निवडक मित्रांनाच ठावुक आहे. याचे संदर्भासह स्पष्टीकरण करायचे झाले तर माझीच फजिती व्हायची म्हणून एवढेच लिहीतो. बाकी रानडे सरांच्या सुखद आठवणीच्या हिंदोळ्यावर आम्हाला आज तुझ्या लेखणीतुन परत एकदा स्वार होता आले म्हणून तुझे आभार. रानडे सर नेहमी भेटले की आवर्जुन सगळ्यांची चौकशी करतात.सरांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
उत्तर द्याहटवाखूप छान, सरांबद्दल काय आणि किती बाेलू, पाचवीत टाेपीवाला हायस्कूलमधे शिकवलेली रामरक्षा आज ३८ वर्षे स्मरणात आहे म्हणजे कशी शिकवली असेल याचे आजपण अप्रूप वाटते, सर म्हणजे एक महान विद्यापीठ आहे, पित्या समान गुरू भेटणे याला भाग्यच म्हणावे लागेल,
उत्तर द्याहटवा