मुख्य सामग्रीवर वगळा

पावसाळा अन् आमची शाळा.......


पावसाळा अन् आमची शाळा.......
गेले महिनाभर उष्णतेच्या लाटेने सर्वांना हैराण केले होते. त्यामुळे गारव्यासाठी प्रत्येक जण मेघराजाची वाट पाहत होते.काल सकाळी किनारपट्टीवर मात्र पावसाळी वातावरण दिसत होते. मालवणात सकाळी जरासा पाऊस पडला. पण त्यानंतर वातावरणात एक गारवा पसरला. रविवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. अन् तप्त झालेल्या धरणीला शांत करुन गेले. आज वातावरणात सगळीकडे गारवा पसरला आहे. क्षणभरासाठी मिलिंद इंगळेंच्या गारवा अल्बमधील गीतांची आठवण झाली. पाऊस सुरु झाल्याने अनेकांची छत्री, रेनकोट, गाडीचे कव्हर या वस्तू शोधण्याची लगबग सुरु झाली असेल. पाऊस आणि शाळा हे समीकरण ठरलेले आहे. भंडारी हायस्कूलमध्ये आम्ही मोठा पाऊस झाला की नेहमी उत्साहित असायचो. विचार विशेषतः देवबाग, घुमडे येथील मुले आनंदीत असायची. अशातच पावसाचा जोर वाढला की शिपाई मामांचे वर्गात आगमन व्हायचे. शिपाई मामांचे आगमन म्हणजे शाळा सोडून देणार हे जवळजवळ निश्चित असायचे. त्यामुळे आम्ही सर्व साहित्य गोळा करुन वर्गाच्या बाहेर पडण्याच्या तयारीत असायचो. अखेर मुख्याध्यापकांची सूचना आली की शाळेला सुट्टी मिळायची. पावसाळ्याच्या कालावधीत दप्तरात वह्या ठेवणे कौशल्याचे काम असायचे. काही जण वह्या, पुस्तके भिजू नयेत यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांत गुंडाळून ठेवायचे. शाळेतल्या वर्गामध्ये रेनकोट व छत्र्या ठेवण्याची आमची जागा ठरलेली असायची. रेनकोट खिडक्यांना आणि छत्र्या मागच्या बाजुला सुकत ठेवल्या जायच्या. छत्र्या वर्गात पुढच्या बाजूला ठेवल्या तर शिक्षकांचा ओरडा खावा लागायचा. वर्षाची सुरुवात बहुतांश पावसाच्या निबंधाने व्हायची. वर्गातील ठराविक मुले सोडली तर बाकीच्या मुलांचे निबंध थोडे फार सारखेच असायचे. त्यामुळे पावसाळा आणि शाळा या आठवणी न विसरता येण्यासारख्या आहेत. संग्राम कासले.मालवण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.