भाल्या....... भाल्या हा माझा बीएडचा मित्र. मुळात भाल्या आणि माझी मैत्री होईल असे मला कधीही वाटले नव्हते. पण बीएडला पप्पूची ओळख झाली आणि त्यानंतर भाल्या मला भेटला. भाल्याचे नाव भालचंद्र ठाकूर पण बहुतांश मित्र त्याला भाल्याच म्हणतात. भाल्या हे नामकरण पप्पूनेच केले आहे.( असे पप्पू दरवेळी आम्हाला सांगतो.) बीएड होऊन आठ वर्षांचा कालावधी लोटला असेल पण तरीही बीएड लक्षात राहतो ते भाल्या, पप्पू आणि काही मित्र-मैत्रिणीमुळे. बीएड नंतर भाल्या माझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी झाला. बीएडनंतर नोकरीसाठी करावी लागणारी वणवण, मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल येथे तीन वर्षे पगाराअभावी आलेले नैराश्यक्षया कालावधीत माझे कुटुंब, माझे मित्र-मैत्रिणी त्याचबरोबर भाल्याचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. भाल्यानेच मला खडबडून जागे केले आणि मळेवाड येथील शिक्षकाची नोकरी सोडायला लावली. आज त्याचा तो निर्णय मला सार्थ वाटतोय. बार्टीच्या इंटरव्ह्यूच्यावेळी भाल्या दिवसभर माझ्यासोबत पुण्याला थांबून होता हे मी कधीही विसरणार नाही. भाल्या नेहमी म्हणतो शिक्षकापेक्षा तु पत्रकारीतेच्या फिल्डमध्ये मला कम्फर्टेबल वाटतो. ईथेही भाल्याचा डिसीजन चुकला नाही. मी सध्या तरुण भारत मध्ये काम करत आहे. बरेच दिवस माझी बातमी आली नाही की भाल्या आवर्जून फोन करतो. अरे नवीन काय लिहलास नाय हल्ली! कुणालाही आश्चर्य वाटेल पण बीएडनंतर मी आणि भाल्या नेहमी फोनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असतो. (सध्या भाल्याचे लग्न झाल्यामुळे आठवड्यातून एक दोनदा फोन होतो). भाल्याची खरी आवड शिक्षकी पेशा होती.परंतु गेल्या दहा पंधरा वर्षातील शिक्षक क्षेत्रातील अस्थैर्य, नोकरीसाठी करावी लागणारी वणवण यामुळे त्यांने स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडला.आज भाल्या ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयात ऑफिसर म्हणून काम करत आहे. भाल्याचे स्पिरिट माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिलेला आहे.गेल्या आठ वर्षात भाल्या मला सतत जागा करत राहिला. त्यामुळेच मी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू शकलो.
संग्राम कासले, मालवण

भाल्या सारखे मित्र सर्वांना मिळावेत.भाल्याचे पत्रकारितेच्या विषयीचे मार्गदर्शन मलाही अचूक वाटते.भालचंद्र नावाचे भाल्या म्हणून नामांतर करणाऱ्या संग्राम दादा तुझ्या मित्राचे विशेष कौतुक.
उत्तर द्याहटवाWaiting for next blog Sangram Da
थँक्स निखिल
हटवाखरी मैत्री...
उत्तर द्याहटवा