राँक गार्डन परिसरातील निरव शांतता.....
माझा मित्र भूष या स्पाँटवरून नेहमी फोटो काढतो. भूष अँंगलचे असंख्य फोटो त्याने येथून काढले आहेत. मी बोलतोय मालवणच्या राँक गार्डन विषयी. मालवणवासीय आणि असंख्य पर्यटक राँक गार्डनला आवर्जून भेट देतात. राँक गार्डन हे मालवणवासीयांच्या विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण आहे.राँक गार्डन मध्ये येणारा प्रत्येक जण टेहळणी बुरुजावरुन दिसतो. या टेळहणी बुरुजावरुन (आम्ही पत्रकारांनी बनवलेला शब्द) पण कोरोनाच्या संकटामुळे गेल्या ६० दिवसात राँक गार्डन आणि बाजूचा समुद्र किनारा पहायला कोणी फिरकलेल नाही.अथांग पसरलेला सागर आणि खडकाळ भागात त्याच्या धडकणार्या लाटा पाहण्यासाठी असंख्य जण येत असतात. पण गेल्या दोन महिन्यात इथला परिसर निर्मनुष्य भासत आहे. राँक गार्डनच्या बाजूला छोटी छोटी दुकानांमध्ये पर्यटक स्थानिक, नागरिक यांची नेहमी गर्दी असायची पण कोरोनामुळे दुकानेही सध्या बंद आहेत. सध्या फक्त पक्षांचा किलबिलाट आणि सागराची गाजही ऐकू येते. पण सारा परिसर कुणाची तरी वाट पाहतोय. कारण अशी शांतता या परिसराला पसंत नाही. या परिसराला हव आहे लहान मुलांचे बागडणे, सुट्टीत आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटक, मित्र मैत्रीण, कुटुंबातील सदस्यांचा मेळा. पण कोरोनामुळे ते शक्य नाही. निसर्ग नियमाप्राणे कोणतीही गोष्ट स्थिर नाही. त्यामुध्ये बदल होत असतात. कोरोनाचे संकटही कायम राहणार नाही त्यातही बदल होईल. माणूस जिद्दीने कोरोना संकटाचा सामना करतोय. या लढाईत तो कोरोनाला नक्कीच पराभूत करेल. आणि आपल्या दैनंदिन जीवनात पुन्हा त्याच उत्साहाने आनंदाने सामिल होईल. आणि लवकरच आपला आनंद व्यक्त करण्यासाठी राँक गार्डन परिसरात येईल.

नक्कीच पुन्हा गर्दी होईल..
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवासुंदर
उत्तर द्याहटवारॉक गार्डनवर कोणीच नाही हा विचार पण करवत नाहिये
उत्तर द्याहटवा