मुख्य सामग्रीवर वगळा

Rock Garden Malvan


  राँक गार्डन परिसरातील निरव शांतता..... 
 माझा मित्र भूष या स्पाँटवरून नेहमी फोटो काढतो. भूष अँंगलचे असंख्य फोटो त्याने येथून काढले आहेत. मी बोलतोय मालवणच्या राँक गार्डन विषयी. मालवणवासीय आणि असंख्य पर्यटक राँक गार्डनला आवर्जून भेट देतात. राँक गार्डन हे मालवणवासीयांच्या विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण आहे.राँक गार्डन मध्ये येणारा प्रत्येक जण टेहळणी बुरुजावरुन दिसतो. या टेळहणी बुरुजावरुन (आम्ही पत्रकारांनी बनवलेला शब्द)  पण कोरोनाच्या संकटामुळे गेल्या ६० दिवसात राँक गार्डन आणि बाजूचा समुद्र किनारा पहायला कोणी फिरकलेल नाही.अथांग पसरलेला सागर आणि खडकाळ भागात त्याच्या धडकणार्या लाटा पाहण्यासाठी असंख्य जण येत असतात. पण गेल्या दोन महिन्यात इथला परिसर निर्मनुष्य भासत आहे. राँक गार्डनच्या बाजूला छोटी छोटी दुकानांमध्ये पर्यटक स्थानिक, नागरिक यांची नेहमी गर्दी असायची पण कोरोनामुळे दुकानेही सध्या बंद आहेत. सध्या फक्त पक्षांचा किलबिलाट आणि सागराची गाजही ऐकू येते. पण सारा परिसर कुणाची तरी वाट पाहतोय. कारण अशी शांतता या परिसराला पसंत नाही. या परिसराला हव आहे लहान मुलांचे बागडणे, सुट्टीत आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटक, मित्र मैत्रीण, कुटुंबातील सदस्यांचा मेळा. पण कोरोनामुळे ते शक्य नाही.  निसर्ग नियमाप्राणे कोणतीही गोष्ट स्थिर नाही. त्यामुध्ये बदल होत असतात. कोरोनाचे संकटही कायम राहणार नाही त्यातही बदल होईल. माणूस जिद्दीने कोरोना संकटाचा सामना करतोय. या लढाईत तो कोरोनाला नक्कीच पराभूत करेल. आणि आपल्या दैनंदिन जीवनात पुन्हा त्याच उत्साहाने आनंदाने सामिल होईल. आणि लवकरच आपला आनंद व्यक्त करण्यासाठी राँक गार्डन परिसरात येईल.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.