मुख्य सामग्रीवर वगळा

भूष.........


भूष.........
पत्रकारिता, फोटोग्राफी, पेंटिंग, काव्यलेखन याचा कुठल्याही प्रकारचा वारसा नसताना मालवणमधील भूषण मेतर या उदयोन्मुख लेखक, कवी, पत्रकाराने अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. बालपणीच वडीलांचे छत्र हरवलेला भूषण हा संवेदनशील मनाचा आहे. त्याच्या कवितांमधून संवेदनशील मनाचे दर्शन घडते. भूषणच्या कविता या समाजातील सर्व घटकांचा वेध घेणाऱ्या आहेत. मैत्री, प्रेम, शाळा, पारंपरिक मच्छीमार, मत्स्यसंस्कृती, किनारपट्टीवर येणारी वादळे या सारख्या घटनांना भूषणने कवितेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत मांडले आहे. भूषण हा उत्तम चित्रकार आहे. शालेय जीवनात त्याने असंख्य चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांमध्ये त्याने समाजमनाचा वेध घेतलेला दिसतो. पत्रकारितेच्या निमित्ताने भूषण शहरी व ग्रामीण भागात सातत्याने भ्रमंती करत असतो. ही भ्रमंती करताना त्याने कँमेराने केलेले क्लिक अफलातून आहेत. मालवण राँक गार्डन, भंडारी हायस्कूल, टोपीवाला हायस्कूल, चिवला बीच, बंदरजेटी, मालवण किनारपट्टी ही भूषणने व्लिक केलेली छायाचित्रे सर्वांच्या पसंतीस उतरलेली आहेत. छायाचित्र, काव्यलेखन हा छंद जोपासताना पत्रकारितेच्या माध्यमातूनही समाजप्रबोधन करण्याचे काम भूषण गेली आठ वर्षे करत आहे. वेगवेगळ्या समस्या भूषणने वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून भूषण नेहमी अँक्टीव्ह असतो. फेसबुकवर त्याचा प्रचंड मित्रपरिवार आहे.  दिवसभरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी भूषणने खबरनामा सुरु केला होता. सध्या हा खबरनामा बंद आहे. त्याने खबरनामा पुन्हा सुरु करावा असे मी त्याला सुचवेन. सामाजिक उपक्रमातही भूषण सक्रिय असतो. साहित्य सहवास, भंडारी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना या सारख्या संघटनांद्वारे तो आपले सामाजिक योगदान देत आहे. भूषण याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! (संग्राम कासले, मालवण)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.