मुख्य सामग्रीवर वगळा

नवे वर्ष नवी उमेद


आज 1 जानेवारी 2021 नवीन वर्षाचा पहिला दिवस. भंडारी हायस्कूलमध्ये असताना सामंत सर आम्हाला आवर्जून सांगायचे नवीन वर्षात नवीन संकल्प करावा. सरांच्या विधानाचे आज स्मरण होत आहे. 2020 हे वर्ष कोरोना साथ रोगामुळे लक्षात राहिले. संपूर्ण वर्ष कोरोना साथीशी लढण्यात गेले. नागरिकांनी मानसिक कणखरपणा दाखवत कोरोनाशी सामना केला. कोरोनाविरुद्धची लढाई अजूनही सुरुच आहे. कोरोनाने आपल्याला बरच काही शिकवले. रोजचा दिवस हा नवीन काहीतरी घेऊन येत असतो. या दिवसात सु:ख, दु:ख, यश, अपयश, आशा, निराशा असे सारे असते. या सर्वांचा थोडा बहुत आनंद लुटतच आपल्याला जीवन जगाव लागणार आहे. कोरोनामुळे प्रत्येकाला एका दिवसाचे महत्व उगमले असेल. त्यामुळे नवीन वर्षातला प्रत्येक दिवस आनंदाने उत्साहाने जगूया. अगले दिन जो होगा सो देखा जायेगा! या उक्तीप्रमाणेच नवीन वर्षाचे आनंदाने उत्साहाने स्वागत करुया. कोरोनाने मला वर्षभरात बरच काही शिकवल. किंबहुना अनेकांकडून मी शिकत गेलो. रोजगाराचे साधन गमावलेला कणकवली येथील माझा मित्र उमेश बुचडेने वडापावची गाडी उभी करुन परिस्थितीसमोर न झुकण्याचा आदर्श घालून दिला. मुंबई येथील अभिनेता रोहन पेडणेकर याने कठीण काळात सुक्या मच्छीचा व्यवसाय करुन परिस्थितीसमोर लढल पाहिजे याचा वस्तुपाठ घालून दिला. कोरोना काळात रोजगाराची समस्या निर्माण झाल्याने अनेकांनी स्वतः धडपड करुन छोटासा का होईना पण स्वतः चा व्यवसाय सुरु केला. वर्षभरातील अनेक उदाहरणे बरच काही शिकून गेली. नवीन वर्षात बरेच नवे संकल्प केले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी दिलसे प्रयत्न होणार आहेत. नवीन वर्षात सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक संकल्प पूर्ण करण्याचा माझा संकल्प असेल. 2021 मध्ये विविध विषयावरच वाचन करायचे आहे. कारण गेल्या काही वर्षात म्हणाव तस वाचन झालेले नाही. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त परीक्षांना बसायचे आहे. भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रबोधनातून प्रसार करायचा आहे. यासारखे अनेक संकल्प पूर्ण करायचे आहेत. लवकरच नवीन संकल्प पूर्ततेच्या माध्यमातून भेटत राहू.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.