आस्था ग्रुपच्या वतीने देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन ही माझ्या ब्लॉग वरील शंभरावी पोस्ट होती. १०० व्या पोस्टचा हा प्रवास अतिशय रंजक असा आहे. कोरोना कालावधीत मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. कारण कोरोना कालावधीत वेळेची उपलब्धता होती. त्यामुळे वेळेचा सदुपयोग होण्यासाठी व काहीतरी वेगळं करावं या हेतूने मी ब्लॉग घेण्यास सुरुवात केली. माझा पहिला ब्लॉग माझा मित्र भालचंद्र ठाकूर याच्यावर लिहिला त्यानंतर ब्लॉग लिहिण्याचा प्रवास सुरूच राहिला. या ब्लॉगमध्ये व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, संस्मरणीय घटना यांचा समावेश होता. परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे ब्लॉगमध्ये सातत्य ठेवणे शक्य झाले नाही. कधी कधी माझ्याकडून दिवसातून एक ब्लॉग घेण्याचा प्रयत्न व्हायचा तर कधी कधी बऱ्याच दिवसांनी ब्लॉक लिहीन होऊ लागलं. परंतु आता नवीन मोबाईल घेतल्यामुळे ब्लॉगमध्ये नियमितपणा येऊ लागला आहे. मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने ब्लॉग लिहिणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण ज्या वातावरणात घडतो, ज्या समाजातून घडतो त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. त्यामुळे त्याची नोंद कुठेतरी असणे आवश्यक आहे. इतिहासात मागे वळून पाहताना आपण काय केले याचे विचार मंथन होणे आवश्यक आहे. या दृष्टीने मला टोपीवाला हायस्कूल येथील टाईम कॅप्सूल म्हणजेच कालकुपीचे उदाहरण द्यावेसे वाटते. काही वर्षांपूर्वी टोपीवाला हायस्कूलने आपल्या शाळेच्या प्रांगणात टाईम कॅप्सूल म्हणजेच कालकुपी तयार केली होती. या कालकुपीमध्ये टोपीवाला हायस्कूलशी संबंधित असंख्य गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. शंभर वर्षानंतर काल कुपी जेव्हा उघडली जाईल त्यावेळी त्या पिढीला 100 वर्षांपूर्वी इथे काय घडलं होतं याची माहिती मिळेल. त्यावेळीच्या संस्कृतीची देखील माहिती मिळेल. त्यामुळे प्रत्येकाने ब्लॉग लिहीन हे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आहे त्याचे विचार स्वतंत्र असतात.हे विचार पोहोचवण्याचे माध्यम म्हणजे लेखन. असते सध्या सोशल मीडियामुळे पुस्तक वाचण्याचे प्रमाण कमी झाले. आहे. त्यामुळे या ब्लॉगच्या निमित्ताने लिहिणे होते, वाचणे होते आणि सर्वांपर्यंत पोहोचता देखील येते. एक प्रकारे ही प्रत्येकाची डायरीच असते असे मला वाटते. त्यामुळे प्रत्येकाने ब्लॉग लिहावा असे मला वाटते. मी ब्लॉक सुरू केल्यानंतर काही महिन्यातच युट्युब सुरू केले. या youtube वर विविध विषयांची मी मांडणी केली. जे विषय मला आवडले भावले व इतरांपर्यंत पोहोचावे असे वाटले त्या विषयाची मांडणी मी youtube च्या माध्यमातून केली. एकूणच काय की आपण प्रत्येकाने लिहीत राहिले, पाहिजे बोलत राहिले पाहिजे, तरच आपल्या हातून नवनवीन चांगल्या गोष्टी घडू शकतात. ब्लॉगच्या निमित्ताने किंवा यूट्यूबच्या निमित्ताने मला जगभरातील अनेक देशांमध्ये आपलं वाचन साहित्य नेता आलं. मी ज्यावेळी ब्लॉगचा वाचक वर्ग पहिला तो वाचक वर्ग 6000 च्या पुढे गेलेला मला दिसून आला त्यामध्ये भारत, युनायटेड स्टेट, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, आयर्लंड यासारख्या देशांचा समावेश होता. म्हणजे आपण जे लिहितो ते जगभरात वाचले जाते. त्याची दखल जग देखील घेतो. त्यामुळे आपली संस्कृती आपले विचार हे जगभरात पोहोचवण्यासाठी ब्लॉग आणि युट्युब हे प्रभावी साधन आहे असे मला वाटते. यापुढेही ब्लॉगच्या निमित्ताने युट्युब च्या निमित्ताने विविध विषय मांडण्याचा आणि आपल्यापर्यंत पोहोचण्याचा माझा निश्चितच प्रयत्न राहील आपण वाचक या माध्यमातून यापुढेही जोडले जाऊ धन्यवाद.
डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले. नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा