मुख्य सामग्रीवर वगळा

मुलांना वृत्तपत्र वाचायची सवय लावा - दिवाणी न्यायाधीश एम. आर. देवकते यांचे प्रतिपादन

सोशल माध्यमांच्या युगात वाचनाची आवड कमी होत चालली आहे. घरामध्ये लहान मुले वाचताना दिसत नाही. त्यामुळे पालकांनी मुलांना मराठी वृत्तपत्र वाचण्याची सवय लावणे गरजेचे आहे. वाचनामुळे मुलांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश एम. आर. देवकते यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजीत कार्यक्रमाप संगी बोलताना केले.

दिवाणी न्यायालय मालवण व मालवण तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवाणी न्यायाधीश एम. आर. देवकते हे बोलत होते. यावेळी पत्रकार संग ाम कासले, सहायक अधिक्षक एम. जी. डीसोजा, एस. एन. पालव आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना देवकते म्हणाले, आज पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे दिसत आहे. परंतु असे असले तरी मराठी भाषेविषयीची मुलांची ओढ कमी होउ देता कामा नये. त्यासाठी पालकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पालकांनी स्वत वाचनाची सवय लावुन मुलांनाही वृत्तपत्र, पुस्तक वाचण्यास प्रवृत्त केले पाहिजे.

याप्रसंगी बोलताना संग्राम कासले म्हणाले, युवा पिढी ग्रंथालयांमध्ये जाउन वाचन करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे युवा पिढीला वाचनाकडे वळविण्यासाठी विविध उपक्रम घेणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजमाध्यमांचा सकारात्मक वापर करणे गरजेचे आहे. मराठी भाषेमध्ये दरवर्षी नवनवीन साहित्याची निर्मिती हो असते. त्याबाबत युवा पिढीला माहिती देणे आवश्यक आहे. वरिष्ठ लिपिक श्रीम. यु. एन. मालणकर, कनिष्ठ लिपिक एन. आर. कांबळी, एफ. ए. मेंडीस यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले. सुत्रसंचालन एस. व्ही. जाधव यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.