मुख्य सामग्रीवर वगळा

काळ कितीही बदलला तरी जय भीम हाच आमचा पासवर्ड - सिने अभिनेते नीलेश पवार यांचे प्रतिपादन

आजची युवा पिढी थ्रीजी आणि फोरजी आणि त्याच्या पलीकडे विचार करणारी आहे. या युवा पिढीसमोर क्रांती करणारे बाबासाहेब आपल्याला मांडायचे आहेत. त्यासाठी आपल्याला युवा पिढीशी कनेक्ट व्हावे लागेल. कारण आपण फुले, शाहु, आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आहोत. हा वैचारिक वारसा युवा पिढीपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. कारण काळ कितीही बदलला तरी जय भीम हाच आमचा पासवर्ड असणार आहे. हे कोणीही विसरुन चालणार नाही असे प्रतिपादन सिनेनाटय अभिनेते निलेश पवार यांनी क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाउ यांच्या संयुक्त जयंती उत्सवाप्रसंगी मालवण येथे बोलताना केले.

फुले, शाहु, आंबेडकर विचारमंच महिला विभाग मालवण यांच्यावतीने एसटी स्टैंड येथील समाजमंदिर येथे क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाउ यांची जयंती साजरी करण्यात आली. या कायक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना निलेश पवार हे बोलत होत. यावेळी अखिल भारतीय अनिसचे जिल्हा संघटक विजय चौकेकर, सभेच्या अध्यक्षा माधुरी जाधव, महिला अध्यक्षा नेहा तांबे, सचिव निकीता मालवणकर, दर्शना गुळवे, राखी मालवणकर, निशाली पेंडुरकर, विद्या जाधव, समीक्षा मालवणकर, करुणा मालवणकर, नयना मालवणकर, विशाखा कदम, स्मिता जाधव, स्वाती कदम आदि उपस्थित होते. यावेळी आदर्श शिक्षिका पुरस्काराच्या मानकरी निशाली पेंडुरकर, नौसेना दिनाच्या नि मित्ताने वाहतुक सेवा दिल्याबद्दल किशोर मालवणकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना निलेश पवार म्हणाले, मानव मुक्तीचा जो लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात उभारला त्याला जगानेही मान्यता दिली आहे. जगभरात ज्ञानाचे प्रतिक म्हणुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. ही ओळख प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. कारण जगाने बाबासाहेबांची दखल घेतलेली आहे. ही जगाने घेतलेली दखल आजच्या युवा पिढीसमोर आपल्याला मांडायची आहे. तरच क्रांती करणारे बाबासाहेब त्यांना समजतील व ते चळवळीशी कनेक्ट होतील. सोशल मिडीयाच्या प्रभावात असलेल्या नवीन पिढीला फुले, शाहु, आंबेडकर हे आपल्याला नव्या पद्धतीने समजावुन सांगावे लागतील. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दर्शना गुळवे यांनी तर आभार स्वाती मालवणकर यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.