मुख्य सामग्रीवर वगळा

तरुणांचा धम्म चळवळीत सहभाग

*तरुणांचा धम्म चळवळीत सहभाग*
 मे व जून महिन्यात कट्टा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बौद्धाचार्य श्रामनेर प्रशिक्षण शिबिर पार पडले. त्याची परीक्षा 27 ऑक्टोबर 2024 रोजी कणकवली येथे संपन्न झाली. या शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थिमध्ये मी, सचिन कासले, मनोज काळसेकर 34 वयाच्या दरम्यान होतो. बाकी बहुतांश 50 वयाच्या पुढचे होते. एकूणच ही सर्व परिस्थिती पाहता तरुण धम्म चळवळीकडे मोठ्या प्रमाणात वळताना का दिसत नाही याचे विचार मंथन होणे गरजेचे आहे. 
         या संदर्भात मी टीव्हीवर नामदेव ढसाळ यांची एक मुलाखत पाहिली होती त्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात की जे मूल बौद्ध परिवारात जन्मते त्यांना लहानपणापासूनच घरात तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो दिसतात. हे फोटो पाहूनच ही मुले लहानाची मोठी होतात. त्यामुळे ज्या महामानवांनी या देशात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य केले. त्यांचे कार्य पुढे चालवणे ही त्या बौद्ध घरातील कुटुंबातील प्रत्येकाचे एक कर्तव्यच असते. प्रत्येकाने ते कार्य केलेच पाहिजे. त्याला पर्याय नाही. ही जाणीव प्रत्येक बौद्ध पालकाने आपल्या मुलांमध्ये रुजवली पाहिजे तरच आपली मुले धम्म चळवळीकडे येतील.
          याच अनुषंगाने आणखी एका मुद्द्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. नुकतीच भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणची नूतन कार्यकारणी निवडण्यात आली. ही कार्यकारणी निवडताना संजय पेंडुरकर, सूर्यकांत कदम, रविकांत कदम यांनी माझ्यासारख्या अनेक तरुणांना प्रोत्साहित करून कार्यकारणी संधी दिली. त्यासाठी अनेक प्रकारे त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळेच भारतीय बौद्ध महासभेच्या मालवण तालुका शाखेच्या कार्यकारणीत अनेक नवीन चेहरे दिसत आहेत. 
       धम्म चळवळ हा वारसा प्रत्येकाला आपल्या घरातून व समाजातून मिळत असतो. मला हा वारसा माझे आजोबा, वडील त्याचप्रमाणे सिंधुदुर्गातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून मिळाला आहे. त्यामुळेच मी या धम्म चळवळीत येऊ शकलो. आज हाच वैचारिक वारसा प्रत्येक बौद्ध समाजातील वडीलधारी माणसे, कार्यकर्ते यांनी आजच्या तरुणांना देणे गरजेचे आहे. तरुणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जयंती बुद्ध पौर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन दिन अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करणे गरजेचे आहे व हे प्रबोधनातून शक्य आहे. एखादा तरुण बेकार असू दे किंवा सरकारी नोकरीला असू दे, किंवा व्यवसाय करत असू दे, वर्षातून चार ते पाच दिवस तो कार्यक्रमांना निश्चित उपस्थित राहू शकतो. व या कार्यक्रमातूनच त्याच्या जीवनाला एक चांगल्या पद्धतीची दिशा मिळू शकते. एकदा तरुणाला धम्माची गोडी लागली तर तो आपसूक धम्म चळवळकडे वळणार आहे. पण त्यासाठी तरुणांना सक्तीने नाही तर आपुलकीने, प्रेमाने, प्रबोधनाने या धम्म चळवळीकडे वळवणे गरजेचे आहे. 
        *आयु. संग्राम सतीश कासले* 
*M.A, B.Ed, MSW, MCJ, LLB*
(*लेखक, शिक्षक, पत्रकार, समुपदेशक, तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणचे प्रचार व पर्यटन विभागाचे सचिव आहेत*)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाच दिवसीय नाट्य कला कार्यशाळा डोंबिवली येथे आनंदात पार पडली.

डॉ. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग अंतर्गत दुर्वा एडुटेंमेंट आयोजित नाट्य कला कार्यशाळा दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधी मध्ये डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या नाट्य कला कार्यशाळे मध्ये जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्य लेखन कसे करावे ? यावर सहभागी कलाकारांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. नाटक का लिहावे ? कश्या साठी लिहावे ? कोणासाठी लिहावे ? कसे लिहावे ? आदी. खुप सखोलपणे मार्गदर्शन केले. नाट्यकर्मी अरुण कदम यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पौरात्य व पाश्चात्य रंगभूमी यावर मार्गदर्शन केले.  नवोदित रंगकर्मी आणि नियमित रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी यांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशा बाबी ओघवत्या शैलीतून समजावून सांगीतल्या. विशेष म्हणजे कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मी यांना बोलते करून विशिष्ट प्रसंगासाठी तुम्ही नेपथ्य व प्रकाश योजना कशी कराल हे त्यांच्याकडून वदवून घेतले. नाटककार अशोक हंडोरे यांनी इंप्रोव्हायझेशन, नाट्य खेळ,...

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे* *लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांचे प्रतिपादन*

मालवण वार्ताहर -         स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.         या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्य...

डीएड कॉलेज मालवण येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालवण वार्ताहर - डीएड कॉलेज मालवणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चैताली शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी ऐश्वर्या धुरी, दिशा चव्हाण, चैताली शिंदे, संग्राम कासले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी डीएड कॉलेज मालवणचे प्रा.दत्तात्रय माळी, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. संजय केळुसकर आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी गोडे यांनी केले तर आभार ऐश्वर्या धुरी यांनी मानले.